मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय… त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरकही समजेना!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय… त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरकही समजेना!

Feb 09, 2024, 04:11 PM IST

    • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय असून त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरकही समजत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय… त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरक समजेनाः नाना पटोले

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय असून त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरकही समजत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

    • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम, हतबल व निष्क्रीय असून त्यांना माणूस व कुत्र्यामधला फरकही समजत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील कायद्या व सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले असून गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनांनंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब असून मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

राज्यात तडीपार गुडांना राजाश्रय मिळत असून पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीस हतबल असल्याचं पटोले म्हणाले. राज्यातलं हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.

पटोले पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था पार बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. ‘गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’ असx बेजबाबदार वक्तव्य करुन फडणवीस यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवलं आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातला फरकही कळत नाही का?, असा सवाल केला आहे.

नागपुरात अवैध बंदुकींचा सुळसुळाट

भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे हे केंद्र सरकारच्या National Crime Records Bureau (NCRB) च्या अहवालात म्हटले आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूर शहराचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो. राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहे. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. काही भ्रष्ट व कलंकित आयपीएस अधिकाऱ्यांना नियम डावलून प्रमोशन दिले गेले असून राज्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या