Gondia News : शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा मृत्यू, महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप
Sep 20, 2023, 10:16 PM IST
Gondia news : शेतात काम करताना एका शेतकरी दाम्प्त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
Gondia news : शेतात काम करताना एका शेतकरी दाम्प्त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
Gondia news : शेतात काम करताना एका शेतकरी दाम्प्त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या घटना नियमित समोर येत असतात. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली असून यात एका दाम्पत्याला जीव गमवावा लागला आहे. शेत शिवारात शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली. पती-पत्नीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात भात पिकाचे निंदण करण्यासाठी दोन भाऊ गेले होते. सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. त्यांच्या शेतात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. शेतात काम करत असताना या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू झाला. तुळशीदास रेवाराम लंजे (वय ४५ वर्षे), त्यांची पत्नी मायाबाई तुळशीदास लंजे (वर्ष ४२वर्षे) अशी मृतांची नावे असून. या घटनेत इंदुबाई हिरालाल लंजे (वय ४३वर्षे) या जखमी झाल्या आहेत. इंदुबाई यांचे पती घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले. त्यामुळे इंदुबाई यांचे प्राण वाचले.
लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे ३३ एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईनची तार मागील आठवड्यापासून तुटून पडली आहे. याची तक्रार काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र, विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकरी दाम्पत्याला आपले जीव गमवावे लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.