Mumbai girl rape : मुंबई पुन्हा हादरली! १५ वर्षांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत सामूहिक बलात्कार
Sep 25, 2023, 02:11 PM IST
Mumbai Mulund minor girl Rape: मुंबईतील मुलुंडमध्ये एका अल्पवयीन मुलीला चाकूचा आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Mulund minor girl Rape: मुंबईतील मुलुंडमध्ये एका अल्पवयीन मुलीला चाकूचा आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Mulund minor girl Rape: मुंबईतील मुलुंडमध्ये एका अल्पवयीन मुलीला चाकूचा आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यात सर्वाधिक गुन्हे हे महिला अत्याचारांशी संबंधित आहे. मुलुंड येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Amaravati Crime : अमरावती हादरले ! प्रेयसीच्या आईला आणि भावाला जाळून ठार मारले; नंतर तरुणाने स्वत:लाही पेटवले
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता ही मुंबईच्या मुलुंड परिसरात राहायला आहे. या ठिकाणी दोघा आरोपींनी या मुलीला चाकूचा आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली, यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी एका २१ वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहे. या साठी पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले आहे.
Pune Crime : गुप्तधनाच्या मोहापाई व्यावसायिकाने गमावले तब्बल ३० लाख; पुण्यातील बाणेर येथील घटना
आरोपी हा त्याच्या गावी गेला असल्याच्या शक्यतेने पोलिस परराज्यात देखील तपास करत आहेत. आरोपींनी मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे दीलेल्या तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पोलिस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीच्या घटर्न वाढत असून यात महिला आणि मुलींना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.