मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला.. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवी 'डेडलाईन'

Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला.. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवी 'डेडलाईन'

Aug 11, 2022, 10:34 PM IST

    • खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आयोगाने शिवसेनेची मागणी अमान्य करत केवळ १५ दिवसांची मुदत दिली आहे.
उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला..

खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आयोगाने शिवसेनेची मागणी अमान्य करत केवळ १५ दिवसांची मुदत दिली आहे.

    • खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आयोगाने शिवसेनेची मागणी अमान्य करत केवळ १५ दिवसांची मुदत दिली आहे.

मुंबई – गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेसमोर अडचणींमागून अडचणी येत आहेत. त्यात विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेना आमदाराची वर्णी लागल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचा लोगो धुनष्यबाणावर सुरू असलेल्या संघर्षावर उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटाला चार आठवड्यांची मुदत देण्यास दिला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रांची पुर्तता करण्यास केवळ १५ दिवसांचा अवधी दिला आहे. या दिलेल्या मुदतीतच कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर शिवसेनेचे काही खासदारही शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच म्हणत शिंदे गटाकडून  धनुष्यबाण चिन्हावर (shivsena party symbol dispute)  दावा करण्यात आला. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. 

याबाबत संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला  पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावे लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील सत्तासंघर्षावर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

पुढील बातम्या