मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

Feb 16, 2024, 09:04 AM IST

  • devendra fadnavis statement on amruta fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल केलेले व्यक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांच्या तोंडाला चिकट पट्टी लावता आली असते तर बरं झाले असते असे म्हटले आहे.

devendra fadnavis statement on amruta fadnavis

devendra fadnavis statement on amruta fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल केलेले व्यक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांच्या तोंडाला चिकट पट्टी लावता आली असते तर बरं झाले असते असे म्हटले आहे.

  • devendra fadnavis statement on amruta fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल केलेले व्यक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांच्या तोंडाला चिकट पट्टी लावता आली असते तर बरं झाले असते असे म्हटले आहे.

devendra fadnavis statement on amruta fadnavis : महाराष्ट्रातील स्पष्टवक्ते नेते भाजप मधील प्रमुख असलेले देवेंद्र फडणवीस सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा कोसळले तेव्हा, अमृता फडणवीस यांच्या बद्दल गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर पडायचे असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणीवस यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावता आली तर बरं होईल, असे फडणवीस म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नावर उत्तरे दिली.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Maharashtra Weather Update : विदर्भात आजही पावसाची शक्यता! 'या' जिल्ह्यात बरसणार, असे असेल राज्याचे हवामान

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी गुप्त ऑपरेशन भाजपंन राबवले होते. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह सूरतला गेले होते. दरम्यान, यानंतर महावीकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर जुलै २०२२ मध्ये एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल गौप्यस्फोट केलेला. त्या म्हणाल्या, “देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मला सुद्धा ते ओळखायला यायचे नाहीत. मी त्यांना विचारलं की हे काय चाललं आहे? ते म्हणायचे काही नाही. पण मला तेव्हा वाटायचं की काहीतरी सुरु आहे.”

shark in palghar : पालघर येथे तरुणाच्या पायाचा लचका तोडणाऱ्या मृत शार्क माशाच्या पोटातून निघाली तब्बल १५ पिल्लं

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

मुलाखतीत या बद्दल प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस यांच्या बद्दल बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमृताने जे सांगितलं आहे ते खोटं आहे कसं काय म्हणणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही. पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत की काय करायचं? पण तो काळ आता गेला आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.”

दरम्यान, त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यांच्यावर पुरणपोळ्या खाण्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ३५ पुरणपोळ्यांबाबत जेव्हा अमृता बोलली तेव्हा मी कुठेही गेलो की लोक माझ्यासमोर पुरणपोळ्याच ठेवायचे. आम्हाला सांगायचे वहिनींनी सांगितलंय तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेकदा सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही. कृपया मला पुरणपोळी देऊ नये.” त्यांच्या या उत्तरांमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या