मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज.. अजित पवारांना पत्र लिहून मांडली रोखठोक भूमिका

Devendra Fadnavis : नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज.. अजित पवारांना पत्र लिहून मांडली रोखठोक भूमिका

Dec 07, 2023, 07:10 PM IST

  • Devendra Fadanvis letter to Ajit Pawar : विरोधकांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला आहे. तसे पत्र त्यांनी अजित पवारांना लिहिले आहे.

Devendra Fadanvis letter to Ajit Pawar

Devendra Fadanvis letter to Ajit Pawar : विरोधकांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला आहे. तसे पत्र त्यांनी अजित पवारांना लिहिले आहे.

  • Devendra Fadanvis letter to Ajit Pawar : विरोधकांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला आहे. तसे पत्र त्यांनी अजित पवारांना लिहिले आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूनं सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेटी झोड उठवली. यावरून आता फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित आपली रोकठोक मते मांडली आहेत. देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास त्यांनी आक्षेप घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु झाले. देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेतेनवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजित पवारांच्या गटातील आमदारांसोबत बसले. यावरून विरोधकांनी मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

पुढील बातम्या