मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'शिर्डीत मी प्रार्थना केली अन् कोल्हापुरात महापुराचं संकट टळलं', केसरकरांचा अजब दावा, भुजबळांनी लगावला टोला

'शिर्डीत मी प्रार्थना केली अन् कोल्हापुरात महापुराचं संकट टळलं', केसरकरांचा अजब दावा, भुजबळांनी लगावला टोला

Jul 31, 2023, 04:48 PM IST

  • Deepak kesarkar on Kolhapur flood : कोल्हापुरातलं महापुराचं संकट टळल्याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Deepak kesarkar

Deepak kesarkar on Kolhapur flood : कोल्हापुरातलं महापुराचंसंकट टळल्याबाबतविचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • Deepak kesarkar on Kolhapur flood : कोल्हापुरातलं महापुराचं संकट टळल्याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर एक वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. कोल्हापुरात पूर आला त्यावेळी सुदैवाने मी शिर्डीत होतो. त्यामुळे कोल्हापुरात पूर आला नसल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. शिर्डीत देवाकडे मी प्रार्थना करत होतो त्यामुळे कोल्हापूरकरांवरचे महापुराचे संकट टळलं, असा अजब दावा केसरकरांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. केसरकरांच्या दाव्यावर छगन भुजबळांनीही खोचक टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापुरावर ओंघावणारं महापुराचं संकट टळल्याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.


काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने तसेच राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कोल्हापूरवर महापुराचं संकट ओढावलं होतं, मात्र पावसाचा जोर ओसरला आणि कोल्हापूरवरचं महासंकट दूर झालं. यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजब विधान केलं आहे.
 

राधानगरी धरणातून यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊनही अनेक गावं पाण्याखाली का गेली नाहीत? असा प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. तेव्हा शिर्डीमध्ये प्रार्थना केल्यामुळे पूर आला नाही, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं.

केसरकरांच्या या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला आहे. तुम्ही इकडे या आनंद आहे, देवाचा धावा करा आणि आमच्या येथील धरणं लवकरात लवकर भरू द्या, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या