मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant Patil : '..तर सीमेवर जाऊन सैनिकांची धुणी-भांडी करेन'; चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

Chandrakant Patil : '..तर सीमेवर जाऊन सैनिकांची धुणी-भांडी करेन'; चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

Jan 29, 2023, 11:36 PM IST

  • Chandrakant patil on political plan : चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटले की, मला जेव्हा सांगतील तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेऊन सीमेवर जाईन व सैनिकांची भांडी धुण्याची सेवा करेन.

चंद्रकांत पाटील

Chandrakant patil on political plan : चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटले की, मला जेव्हा सांगतील तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेऊन सीमेवर जाईन व सैनिकांची भांडी धुण्याची सेवा करेन.

  • Chandrakant patil on political plan : चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटले की, मला जेव्हा सांगतील तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेऊन सीमेवर जाईन व सैनिकांची भांडी धुण्याची सेवा करेन.

Chandrakant patil :  मला जेव्हा केव्हा सांगतील, तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईन आणि सीमेवर जाऊन सैनिकांचे भांडे धुण्याची सेवा करेन, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  पुण्यात एका कार्यक्रमात केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

पुण्यात भाजपकडून सन्मान स्त्री शक्तीचा हा मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ  वाटपाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला जेव्हा केव्हा सांगतील तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल आणि सीमेवर जाऊन सैनिकांची भांडी धुईल, कपडे धुईल, ही सेवा मी करेन. या गोष्टीसाठी मला माझ्या पत्नीचा पाठिंबा आहे. प्रत्येक जण आपल्या स्वप्नातील भारत पहात असतो, मात्र माझ्या स्वप्नातील भारत अफाट आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, इसवी सन बाराशे वर्षांपर्यंत आपला भारत समृद्ध व  गुण्या-गोविंदाने रहात होता. मात्र नंतर देशाचा सत्यानाश केला. देशाच्या दुश्मनांना माहिती होते की, या देशातील हिंदू पुरुष लढवय्या आहे, पण तो दोन गोष्टींनी खचून जातो. पहिली म्हणजे त्याचा देव भ्रष्ट झाला अन् दुसरी म्हणजे त्याची स्त्री भ्रष्ट झाली तर.. म्हणून त्या लोकांनी अभ्यास करून आपली मंदिरं तोडली आणि देवांच्या मूर्ती पाण्यात टाकल्या. त्याचबरोबर येथील महिलांनाही भ्रष्ट केलं.  शत्रुपासून महिलांना वाचवण्यासाठी घुंघट घालण्याची प्रथा आली. आता तिचा घुंघट काढायला हवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

पुढील बातम्या