“उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं मात्र त्यांना नियतीने …” भगतसिंह कोश्यारींचं सनसनाटी विधान
Feb 20, 2023, 07:27 PM IST
Bhagat singh koshyari target uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं होतं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं, असा खोचक टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला आहे.
Bhagat singh koshyari target uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं होतं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून,त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं, असा खोचक टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला आहे.
Bhagat singh koshyari target uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं होतं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं, असा खोचक टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदातून मुक्त झाल्यानंतर एका वृत्तवाहिनाला सनसनाटी मुलाखत देत महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख संत माणूस असा केला आहे, मात्र आमदार येऊन सांगायचे की, ते शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ असल्याचा घणाघात भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.
कोश्यारी म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना व त्यांची इच्छा नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता, असा टोलाही कोश्यारी यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, असा घणाघात कोश्यारी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं होतं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो.
कोश्यारींना कधी उतरवले होते विमानातून -
भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांना मसुरी येथे आयएएस अॅकॅडमीत एका कार्यक्रमासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचं होतं. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून खाली उतरावं लागलं होतं.