मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  यश-नेहाचा विवाह सोहळा आज पुन्हा, व्यत्ययासाठी 'झी'ने मागितली माफी

यश-नेहाचा विवाह सोहळा आज पुन्हा, व्यत्ययासाठी 'झी'ने मागितली माफी

Jun 13, 2022, 03:36 PM IST

    • झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत विवाह विशेष भाग संदर्भात झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवरून प्रेक्षकांची माफी मागितली असून, कालचा एपिसोड पुन्हा दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या विशेष भागात नेमकं काय झालं? का मागितली झीने माफी? वाचा इथे
माझी तुझी रेशीमगाठ विवाह विशेष एपिसोड

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत विवाह विशेष भाग संदर्भात झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवरून प्रेक्षकांची माफी मागितली असून, कालचा एपिसोड पुन्हा दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या विशेष भागात नेमकं काय झालं? का मागितली झीने माफी? वाचा इथे

    • झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत विवाह विशेष भाग संदर्भात झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवरून प्रेक्षकांची माफी मागितली असून, कालचा एपिसोड पुन्हा दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या विशेष भागात नेमकं काय झालं? का मागितली झीने माफी? वाचा इथे

झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ याचा काल, १२ जून रोजी यश आणि नेहा यांचा विवाह विशेष भाग होता. पण मालिका दरम्यान दोन वेळा अर्धा तासाचे ब्रेक लागल्याने प्रेक्षक चांगलेच भडकले. आज झी मराठीने त्यांच्या इंस्टा पेजवरून प्रेक्षकांची माफी मागितली असून, तो एपिसोड पुन्हा प्रसारित करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश आणि नेहा यांच्या विवाह सोहळ्यासाठी, रविवारी दोन तासांचा विशेष भाग होता. या महाएपिसोड दरम्यान दोन वेळा अर्ध्या अर्ध्या तासांचे ब्रेक लागले. तसेच हा एपिसोड ४० मिनीटे उशिरा संपला. यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले होते. प्रेक्षकांनी इंस्टा अकाउंटवरून आपला राग व्यक्त करत प्रेक्षकांना गृहीत धरू नका अशाच प्रतिक्रिया दिल्या. पण नेमकी हाय काय प्रकार होता, याबाबत कोणालाच काहीच स्पष्ट कळत नव्हते.

झी मराठीने याबाबत सोमवारी, १३ जून रोजी इंस्टाग्रामवरील ऑफिशियल पेजवरून माहित देत प्रेक्षकांची माफी मागितली. त्यांनी पोस्ट मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे या विवाह विशेष भागात व्यत्यय आला असल्याचे सांगितले.

तसेच रसिकांना या विवाह विशेष भागाचा आनंद आज पुन्हा घेता येणार असल्याचे सांगितले. रसिकांना हा आनंद सोहळा १३ जून रोजी सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता दाखवणार असल्याचे त्यांनी पोस्ट मध्ये सांगितले आहे. हा महाएपिसोड आज होणार असल्याची देखील पोस्ट केली आहे.

विभाग

पुढील बातम्या