मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डमधून फोन, काय होतं नेमकं प्रकरण जाणून घ्या

Suniel Shetty: सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डमधून फोन, काय होतं नेमकं प्रकरण जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi

May 29, 2023, 04:38 PM IST

    • Suniel Shetty : सुनील शेट्टीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
Suniel Shetty

Suniel Shetty : सुनील शेट्टीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

    • Suniel Shetty : सुनील शेट्टीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकत असतो. त्याने आजवर तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. ९०चे दशक सुनील शेट्टीने गाजवले होते. नुकताच त्याने एका मुलाखतीमध्ये "९० च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे" असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

सुनील शेट्टीने नुकताच एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याने ९०च्या दशकातील काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. 'त्याकाळी मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत होती. आम्ही तुझं असं करू तसं करू अशा धमक्या देणारे कॉल मला येत असे. पण उलट मी त्यांनाच शिव्या द्यायचो. माझ्यासोबत असणारे पोलीस मला नेहमी ओरडायचे तू वेडा आहेस का? त्यांना तुझा राग आला तर ते तुझा जीव घेतील असे मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. त्यावर माझे उत्तर ठरलेले असायचे मी काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. तुम्ही सगळ्यांनी माझे रक्षण करायला हवे या स्टाइलमध्ये मी त्यांना उत्तर द्यायचो' असे सुनील शेट्टी म्हणाला.

पुढे तो म्हणाला, 'माझ्या कुटुंबीयांना याबाबत काहीच माहिती नव्हती. मी कधीही माझ्या आयुष्याबद्दल अहान आणि अथियाला सांगितले नाही. मी अनेक अतरंगी गोष्टी केल्या आहेत. आजारी पडल्यावर कोणालाही न सांगता उपचार घेत स्वत:च ठिक झालो. मला असे वाटते की प्रत्येक गोष्टीवर वेळ हे औषध असू शकते आणि ते सर्व काही ठिक करते.'

विभाग

पुढील बातम्या