Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, काय असणार शेवट?
Jul 31, 2023, 08:39 AM IST
- Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या जागी दुसरी कोणती मालिका येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या जागी दुसरी कोणती मालिका येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
- Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या जागी दुसरी कोणती मालिका येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा.' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एका मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला होता. आता या नव्या मालिकेसाठी दीपा आणि कार्तिक ही जोडी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका जवळपास गेले तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. आता मालिकेच्या शेवटच्या भागांचे शुटिंग पूर्ण केल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?
काय पाहायला मिळणार शेवट?
काही महिन्यांपूर्वी मालिकेनं १४ वर्षांचा लीप घेतला होता. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यामध्ये सारंकाही बदलले होते. सध्या कार्तिक खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आयेशाची एण्ट्री झाली. ती पाहून प्रेक्षकांनी तर संताप व्यक्त केला होता. कार्तिक आणि आयेशा एकत्र येऊन दीपाला त्रात देत होते. पण आयेशाची स्मृती गेल्यानंतर मात्र मालिका पुन्हा रटाळ झाली. आता मालिकेच्या शेवटी मात्र आयेशाची स्मृती परत येणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. तसेच ती तिने केलेल्या चुका मान्य करणार आहे. नंतर आता मालिकेच्या शेवटी पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपाचा सुखी संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार.
विभाग