Rang Maza Vegla: अखेर दीपा-कार्तिकचा प्लॅन सफल होणार! आयेशाचा गुन्हा सगळ्यांसमोर येणार?
Jul 19, 2023, 01:58 PM IST
Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिकच्या योजनेनुसार आयेशाला एक मोठा धक्का देऊन तिच्या आजारातून बरं करण्याचा उद्देश आता सफल होणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिकच्या योजनेनुसार आयेशाला एक मोठा धक्का देऊन तिच्या आजारातून बरं करण्याचा उद्देश आता सफल होणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिकच्या योजनेनुसार आयेशाला एक मोठा धक्का देऊन तिच्या आजारातून बरं करण्याचा उद्देश आता सफल होणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यातील अडथळे दूर होताना दिसणार आहेत. दीपा आणि कार्तिकच्या योजनेनुसार आयेशाला एक मोठा धक्का देऊन तिच्या आजारातून बरं करण्याचा उद्देश आता सफल होणार आहे. एकदा का आयेशा तिच्या मानसिक धक्क्यातून सावरली की, तिच्याकडून सगळे गुन्हे कबुल करून तिला पोलीस कोठडीत रवाना करण्यात येणार आहे. परंतु, आयेशाला शिक्षा देण्याचा हा पुढील टप्पा दीपा आणि कार्तिकसाठी अजिबातच सोपा नसणार आहे. त्यांच्या मार्गात आता आणखी काही अडथळे येणार आहेत.
लग्न झाल्यापासूनच दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात सतत काहीना काही कारणामुळे तणाव येतच होता. दीपा गर्भवती असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कार्तिकने तिला घराबाहेर काढले होते. या दरम्यान मालिकेत ६ वर्षांचा लीप आला होता. दीपा आणि कार्तिक या जोडीला जुळ्या मुली होतात. मात्र, यातील एक दीपाकडे तर, दुसरी कार्तिककडे वाढते. दरम्यान पुन्हा दोघे एकमेकांच्या आयुष्यात येतात. सगळं काही सुरळीत सुरू आहे, म्हणून ते पुन्हा एकदा एकमेकांशी लग्नगाठ बांधतात. मात्र, परत त्यांच्या नात्यात विघ्न उभे राहते. यावेळेस ते एकमेकांपासून १४ वर्षांसाठी दुरावतात.
Jailer Title: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे नाव अडकले वादात! रिलीज आधी शीर्षक बदलणार?
आता १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत ना दीपाचा दोष होता न कार्तिकचा.. मात्र, तरीही कार्तिकला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली. परंतु, आता या गुन्ह्यामागील खरा सूत्रधार समोर आला असून, आयेशानेच सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्याचे आता समोर आले आहे. मात्र, आयेशा आजारी असल्याने तिला कोर्टाच्या नियमानुसार शिक्षा होऊ शकत नव्हती. कार्तिकशी लग्न मोडल्याने तिला १४ वर्षांपूर्वी मानसिक धक्का बसला होता. यातून बाहेर पडण्यासाठी कार्तिकने तिच्या समोर येणं गरजेचं होतं.
आता आयेशाला शिक्षा घडवायचीच म्हणून कार्तिक आणि दीपाने एक डाव आखला. या प्लॅननुसार कार्तिक आयेशाच्या समोर गेला आणि आयेशा १४ वर्षांच्या मानसिक धक्क्यातून सावरली. आता ती बरी झाल्याचे कळताच दीपा आणि कार्तिक अतिशय सावधगिरीने पुढची पावलं उचलणार आहेत.