मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: गौरीनं कायमचं तोडलं यशसोबतचं नातं, अरुंधती कशी सांभाळणार लेकाला

Aai Kuthe Kay Karte: गौरीनं कायमचं तोडलं यशसोबतचं नातं, अरुंधती कशी सांभाळणार लेकाला

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 27, 2023, 12:59 PM IST

  • Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने नुकताच दुसरे लग्न केले आहे. तिच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असतनाच गौरीने यशसोबतचे नाते तोडल्याने मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे.

आई कुठे काय करते

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने नुकताच दुसरे लग्न केले आहे. तिच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असतनाच गौरीने यशसोबतचे नाते तोडल्याने मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे.

  • Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने नुकताच दुसरे लग्न केले आहे. तिच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असतनाच गौरीने यशसोबतचे नाते तोडल्याने मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये आता प्रेक्षकांना अनेक नवी वळणं पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत नुकतंच अरुंधती आणि आशुतोषच लग्न पार पडलं आहे. त्यांच्या लग्नाता अनिरुद्धने अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. अरुधंती आता तिच्या नव्या संसारात रमली आहे. अशातच आता गौरीने यशसोबतचे नाते तोडल्यामुळे मालिकेत नवे वळण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

आई कुठे काय करते मालिकेचा नवीन एपिसोड अपडेट समोर आली आहे. या एपिसोडमध्ये यामध्ये ईशा सगळ्यांना गौरीने यशसोबतचा साखरपुडा मोडल्याचं सांगते. हे ऐकून अप्पा आणि कांचनला मोठा धक्का बसतो. अनिरुद्ध या सगळ्यात गौरीच दोषी आहे असे सांगतो. गौरी फक्त यशसोबत टाइमपास करत होती असे सगळ्यांसमोर चिडून बोलते. हे सगळं ऐकून अरुंधतीला धक्का बसतो.
वाचा: शुटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी, टायगरसोबत सीन शुट करताना झाला अपघात

यशने काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून अरुंधती त्याला समजावते. 'तू फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी महत्वाचा आहेस. काहीही झालं तरी तुझी आई तुझ्यासोबत कायम असेल' असे अरुंधती यशला बोलते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून यश आणि गौरी यांच्यामध्ये भांडणे सुरु असल्याचे दिसत आहे. त्यात गौरी अचनाक अमेरिकेला निघून गेली होती. ती अरुंधतीच्या लग्नासाठी अचानक मुंबईत येते. दोघांचं बोलणं होतं आणि यश तिला तुझा निर्णय झाल्याशिवाय तोंड दाखवू नको सांगतो. त्यानंतर अचानक गौरी यशला सोडून अमेरिकेला निघून जाते.

विभाग

पुढील बातम्या