मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Jayant Patil : तुषार गांधींना पोलिसांनी ताब्यात का घेतलं?, जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Jayant Patil : तुषार गांधींना पोलिसांनी ताब्यात का घेतलं?, जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Aug 09, 2023, 04:18 PMIST

  • Jayant Patil On Tushar Gandhi : भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी निघालेले महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी येत असतो, परंतु यावेळी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी का ताब्यात घेतलं?, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. पूर्वीसारखीच स्थिती आहे, अशी चिंता आता लोकांना वाटायला लागल्याचं सांगत जयंत पाटील यांनी तुषार गांधी यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.