मराठी बातम्या  /  क्रीडा  /  U19 World Cup: अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या लेकींसाठी जय शाहांची मोठी घोषणा

U19 World Cup: अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या लेकींसाठी जय शाहांची मोठी घोषणा

Jan 30, 2023, 09:34 AM IST

  • Jay Shah:  दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय मुलींसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

Jay Shah

Jay Shah: दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय मुलींसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

  • Jay Shah:  दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय मुलींसाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

U19 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने धुव्वा उडवत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली. या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

“भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे. या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे”, असं जय शाह यांनी ट्वीट केले आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तितास साधू, अर्चना देवी आणि पर्शावी चोप्रा यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ६८ धावांवर आटोपला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १४व्या षटकातच विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले. या सामन्यात तितास साधूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

विभाग

पुढील बातम्या