मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India T20 WC Squad: ‘हे’ चार खेळाडू T20 वर्ल्डकप संघात हवे होते, भारतीय दिग्गजानं सुचवली नावं

India T20 WC Squad: ‘हे’ चार खेळाडू T20 वर्ल्डकप संघात हवे होते, भारतीय दिग्गजानं सुचवली नावं

Sep 30, 2022, 12:34 PM IST

    • Dilip Vengsarkar on India T20 WC Squad भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अशा ४ नावांची नावे सुचवली आहेत, ज्यांना टी-20 विश्वचषकाचा भाग व्हायला हवे होते. यामध्ये उमरान मलिकसह श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आणि शुबमन गिल यांच्या नावांच समावेश आहे.
umran malik

Dilip Vengsarkar on India T20 WC Squad भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अशा ४ नावांची नावे सुचवली आहेत, ज्यांना टी-20 विश्वचषकाचा भाग व्हायला हवे होते. यामध्ये उमरान मलिकसह श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आणि शुबमन गिल यांच्या नावांच समावेश आहे.

    • Dilip Vengsarkar on India T20 WC Squad भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अशा ४ नावांची नावे सुचवली आहेत, ज्यांना टी-20 विश्वचषकाचा भाग व्हायला हवे होते. यामध्ये उमरान मलिकसह श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आणि शुबमन गिल यांच्या नावांच समावेश आहे.

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह ऑस्ट्रेलियातील मेगा इव्हेंटमधून बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजानंतर बुमराहही विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत आता बुमराहच्या जागी कोणकोण संघात स्थान निर्माण करू शकेल, अशा नावांची चर्चा क्रिकेट तज्ज्ञांनी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अशा ४ नावांची नावे सुचवली आहेत ज्यांना टी-20 विश्वचषकाचा भाग व्हायला हवे होते.

एका चॅनलशी संवाद साधताना वेंगसरकरांनी सांगितले की, “हा कोणताही आउट ऑफ द बॉक्स विचार नाही. उमरान मलिकला त्याच्या वेगामुळे मी संघात स्थान दिले असते. तो १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. तुम्हाला त्याला निवडावेच लागेल”. तसेच, आशिया चषकातही उमरानची निवड व्हायला हवी होती, असेही वेंगसरकर म्हणाले.

उमरान मलिक व्यतिरिक्त वेंगसरकर यांनी श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आणि शुबमन गिल यांचे नाव घेतले आहे. तसेच, गिल आणि अय्यर दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत. मात्र, ते संघाबाहेर आहेत. ते संघाबाहेर का आहेत? हे समजत नाही, असेही वेंगसरकर म्हणाले. दरम्यान शमी आणि अय्यर यांची नावे विश्वचषकातील राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहेत.

पुढील बातम्या