मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  India T20 WC Squad Analysis : टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघाची ताकद काय आणि उणीवा कोणत्या? जाणून घ्या

India T20 WC Squad Analysis : टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघाची ताकद काय आणि उणीवा कोणत्या? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2024 04:41 PM IST

Team India T20 World Cup Squad Analysis : आयसीसीच्या नियमांनुसार, २५ मे पर्यंत संघ इच्छित असल्यास बदल करू शकतात. पण भारतीय संघाला हे करण्याची गरज भासेल, असे सध्या तरी दिसत नाही.

Team India T20 World Cup Squad Analysis : टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघाची ताकद काय आणि उणीवा कोणत्या? जाणून घ्या
Team India T20 World Cup Squad Analysis : टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघाची ताकद काय आणि उणीवा कोणत्या? जाणून घ्या

T20 World Cup 2024 Team India swat Analysis :  आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

तथापि, आयसीसीच्या नियमांनुसार, २५ मे पर्यंत संघ इच्छित असल्यास बदल करू शकतात. पण भारतीय संघाला हे करण्याची गरज भासेल, असे सध्या तरी दिसत नाही. 

आता वर्ल्डकपचा संघ जाहीर झाल्यानंतर भारतीय संघाची ताकद काय आहे आणि उणीवा काय हे पाहावे लागेल.

टीम इंडियाची ताकद काय आहे?

टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद रोहित शर्माची कॅप्टन्सी आहे. तो चांगला कर्णधार आहे आणि  फलंदाजीत तो संघाला वेगवान सुरुवात करून देऊ शकतो. 

भारतीय संघाची दुसरी ताकद म्हणजे जसप्रीत बुमराह, जो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या निवडीमुळे फिरकी विभागही मजबूत दिसत आहे.

सूर्यकुमार यादवच्या रूपाने संघाकडे असा फलंदाजही आहे, जो कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो. तसेच, विराट कोहलीच्या रूपात असा खेळाडू आहे, जो सामन्याच्या ट्रेंडनुसार फलंदाजीची शैली बदलू शकतो. सोबतच संजू सॅमसनदेखील सध्या अतिशय जबरदस्त फलंदाजी करत आहे. तो कोणत्याही क्षणी धावांचा वेग वाढवू शकतो.

टीम इंडियाच्या उणीवा काय?

 टीम इंडियाची सर्वात मोठी उणीव संघाकडे फारसे अष्टपैलू खेळाडू नाहीत. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे शेवटच्या टप्प्यात आल्यावर चांगली फलंदाजी करू शकतात. मात्र हे दोन्ही खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र सहभागी होतील, असे वाटत नाही. 

रवींद्र जडेजा आहे, जो सध्या फारशी स्फोटक फलंदाजी करू शकत नाही. तर ऑस्ट्रेलियासारख्या संघात अनेक स्टार अष्टपैलू खेळाडू आहेत, जे आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने कधीही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. 

जर आपण पुढे बोललो तर बुमराहविरुद्ध धावा करणे सोपे नाही, परंतु त्याच्याशिवाय, डेथ ओव्हर्समध्ये धावांचा प्रवाह रोखू शकणारा दुसरा गोलंदाज नाही. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे, जे भारतीय संघासाठी चिंतेचे कारण बनू शकते. 

सोबतच टीम इंडियाचे गोलंदाज फलंदाजीत काही खास करू शकत नाहीत. सध्याच्या टी-20 क्रिकेटनुसार इतर संघातील गोलंदाजदेखील गरज पडल्यास थोडीफार फलंदाजी करतात आणि धावसंख्येत १०-१५ धावांची भर घालतात.

T20 विश्वचषक २०२४ साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, ए. पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

IPL_Entry_Point