कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा बासरीचे ‘हे’ उपाय!
By
Harshada Bhirvandekar
Aug 23, 2024
Hindustan Times
Marathi
यंदाची जन्माष्टमी खूप खास आहे, कारण यावेळी अनेक शुभ योग तयार होत आहेत.
असे मानले जाते की, या शुभ योगांमध्ये काही उपाय केल्याने शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव दूर होतो.
जर, तुमच्या कुंडलीत शनि शुभ नसेल, तर तो तुम्हाला त्रास देतो. लोकांशी तुमचे संबंध तुटू लागतात.
शनीच्या नकारात्मक प्रभावामुळे शारीरिक वेदना वाढू शकतात.
जीवनातील या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी जाऊन बासरीमध्ये मध टाकावा.
ज्यांच्या कुंडलीत राहू वाईट आहे, त्यांनी जन्माष्टमीला हा उपाय अवश्य करावा.
अशुभ राहू व्यक्तीला चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या संगतीकडे नेतो. राहू तरुणांचे विचार भ्रष्ट करू शकतो.
या सर्व समस्या सोडवण्यासाठी एका बासरीत ५ बदाम भरून ते श्रीकृष्ण मंदिरात अर्पण करा.
बासरीचा हा शक्तिशाली उपाय कृष्णाच्या कृपेने राहूचा क्रोध शांत करेल.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा