सकाळी झाडू मारताना करा ‘हे’ काम; गरिबी होईल दूर!
By
Harshada Bhirvandekar
Mar 18, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते असे म्हणतात.
झाडूचा योग्य वापर केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातली दारिद्र्य दूर होते, अशीही मान्यता आहे.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला दररोज झाडूशी निगडीत तीन उपाय करावे लागतील. यामुळे तुम्ही शनीच्या प्रकोपापासूनही दूर राहू शकता.
शास्त्रानुसार, सूर्योदयानंतर झाडूचा वापर करून केर काढल्याने लक्ष्मीचा कोप होतो, असे म्हणतात.
अनेक वेळा लोक चुकून आपल्या घरातील झाडूवर पाय ठेवतात. हे देखील चुकीचे आहे.
तुमच्याकडून देखील कधी झाडूवर पाय ठेवला गेला असेल, तर देवी लक्ष्मीची माफी मागून झाडूच्या पाया पडणं विसरू नका.
सकाळी घरातील केर काढल्यानंतर झाडू स्वच्छ करणे लक्षात ठेवा. अस्वच्छ झाडू ही अलक्ष्मीला आमंत्रण देणारी आहे.
तसेच. घरात झाडू उभा ठेवू नये. त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. तसेच, झाडू घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या खोलीत ठेवावा.
कुरकुरीत मेथीची भजी कशी बनवायची?
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा