दररोज सायंकाळी दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती?
By
Priyanka Chetan Mali
Dec 05, 2024
Hindustan Times
Marathi
दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे फार शुभ आणि लाभदायक मानले जाते.
दिवा लावण्याचेही काही नियम शास्त्रात दिले आहेत, हे नियम लक्षात घेतले पाहिजे.
चला जाणून घेऊया दररोज सायंकाळी दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती आहे.
प्रत्येक घरात संध्याकाळी दिवा लावण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे.
परंतू, अनेक वेळा लोक सायंकाळी नव्हे तर रात्री अंधार झाल्यावर दिवाबत्ती करतात.
सायंकाळी दिवा नेहमी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच सूर्य आकाशात नसतो तेव्हा परंतू उजेड असतो अशावेळी लावला पाहिजे.
अंधार पडल्यावर दिवा लावणे हे सात्विक नव्हे तर तांत्रिक पूजेशी संबंधीत आहे.
मान्यतेनुसार सायंकाळी ५ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंतची वेळ दिवा लावण्यासाठी उत्तम आहे. रात्री उशीरा दिवा लावू नये.
सायंकाळी देवाजवळ, घराच्या मुख्य दरवाजाजवळ, तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे.
संध्याकाळनंतर फुले व पाने का तोडू नयेत?
पुढील स्टोरी क्लिक करा