Video : शिवरायांचा सर्वधर्म समभावाचा विचार जपायला हवा - उदयनराजे
Udayanraje Bhosale speech at Raigad : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर आज पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. शिवभक्तांनी यावेळी हजारोंच्या संख्येनं रायगडावर हजेरी लावली. भगवे फेटे व भगव्या ध्वजांनी संपूर्ण रायगड फुलून गेला होता. शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी यावेळी बोलताना महाराजांच्या कार्याची महती सांगितली. सर्वधर्मसमभावाचा शिवरायांचा विचार आपण जपला पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दिल्लीत शिवाजी महाराजांचं स्मारक होणं गरजेचं आहे, असं उदयनराजे यावेळी म्हणाले.