Jitendra Awhad on Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर फरार असलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण आला. त्यानंतरही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सरकारला व धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. वाल्मिक कराड याचं नाव हत्येच्या गुन्ह्यात का नाही?, असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या रेट्यामुळं आता तो शरण आला आहे, पण धनंजय मुंडे यांचं काय? वाल्मिक कराड हा त्यांचा खास माणूस आहे. मग धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असताना वाल्या कराडवर कारवाई कशी होणार, असा सवाल आव्हाड यांनी केला. सरकारनं आता आपलं काम करावं, अशी मागणी आव्हाड यांनी केली.