Sharad Pawar Video : शरद पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. शहा यांच्या या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'लोकसभा निवडणुकीत जनतेनं धडा दिल्यांतरही आजच्या सत्ताधाऱ्यांचे विचार बदललेले नाहीत. ते पुन्हा त्याच पद्धतीनं वागत आहेत. कायद्याची पायमल्ली केल्याबद्दल ज्या माणसाला सुप्रीम कोर्टानं तडीपार केलं होतं, तो माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे. त्यांच्यावर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. देश कुठल्या दिशेनं चाललाय याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले.