ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांचं खणखणीत भाषण झालं. संजय राऊत यांनी यावेळी शिंदे सेनेवर जोरदार हल्ला चढवला. हरयाणात भाजपला काँग्रेसपेक्षा फक्त ०.६ टक्के मतं जास्त मिळाली. तेवढ्या मतांच्या जोरावर भाजपला ३० जागा जास्त मिळाल्या. हे गणित कल्पनेपलीकडचं आहे. ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय भाजप जिंकूच शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले. याआधी महाराष्ट्रातही काही ठिकाणी हे झालं. पण आता होणार नाही, असंही राऊत म्हणाले. फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. निकाल लागले हरयाणात आणि पेढे वाटतायत फडणवीस, असा टोला राऊत यांनी हाणला.