Jayant Patil speech on budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी निवडणुकीत होणार्या पैशाच्या वापरावर तिरकस टिप्पणी केली. पैसे नाहीत म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निवडणूक लढल्या नसल्याचं आम्हाला कळलं. खरंतर, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर पैशाचा प्रश्नच मिटला असता. इतका पैशाचा महापूर लोकसभा निवडणुकीत आला होता, असं जयंत पाटील म्हणाले.