Jitendra Awhad on Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर फरार असलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण आला. त्यानंतरही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सरकारला व धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्याबरोबरच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गुन्हेगारांवरही कारवाई मुख्यमंत्री करतील, असं आव्हाड म्हणाले. 'मुख्यमंत्री फडणवीस बदलले आहेत. ते कोणत्याही गुन्हेगाराला सोडतील असं वाटत नाही, असंही आव्हाड म्हणाले.