टी-20 विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचं सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे. टीम इंडियानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत संपूर्ण संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. आता (५ जुलै) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियातील मुंबईकर खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राच्या विधानभवनातदेखील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्याचे भाषण पाहून मुख्यमंत्री आणि संपूर्ण सभाग्रह पोटधरून हसलं.