प्रत्येकाला पैशाची गरज असते पण प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा नसतो. बरेच लोक नेहमी कर्जाखाली दबलेले असतात. अशा परिस्थितीत पैशांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत, तुम्ही या उपायांच्या साह्याने आर्थिक स्थिती सुधारू शकता.
विेशेष या उपायासाठी लागणारी वस्तू प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणारी आहे. ही वस्तू तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकते, ती वस्तू म्हणजे तुरटी. तुरटी जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळते.
अशा परिस्थितीत तुरटीशी संबंधित सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही कर्जापासून मुक्ती मिळवू शकता, धनसंचय करू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता.
तुमच्या खिशात पैसे नसतील तर तुरटीचा सोपा उपाय करून पहा. तुम्हाला फक्त तुमच्या पर्समध्ये तुरटीचे काही तुकडे ठेवावे लागतील. असे केल्याने हळूहळू पैशाची कमतरता दूर होते असे मानले जाते.
जे लोक कर्जाखाली आहेत आणि संपत्ती जमवण्यास असमर्थ आहेत त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने दात घासावेत. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातही चांगले बदल दिसू शकतात.
कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुरटीचा तुकडा घेऊन त्यावर लाल सिंदूर ७ वेळा शिंपडावा. असे मानले जाते की हा अतिशय सोपा उपाय तुमचे सर्व कर्ज मिटवून टाकू शकतो आणि यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता.
तुरटीचा तुकडा एका भांड्यात ठेवून घराच्या बाथरूममध्ये ठेवल्यास तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय केल्याने तुम्हाला पैसा तर मिळतोच पण कौटुंबिक वातावरणात सकारात्मकताही येते. या उपायाचा घरातील लोकांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
जे लोक व्यवसाय करतात, त्यांनी चांगला नफा मिळविण्यासाठी त्यांच्या दुकानाच्या किंवा त्यांच्या आस्थापनाच्या मुख्य दरवाजाला कापडात गुंडाळलेली तुरटी बांधावी. या उपायाचा अवलंब करून तुम्हाला व्यवसायात आशादायक परिणाम मिळू शकतात. तुमचे उत्पन्नही वाढू शकते.
तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक घडत नसेल, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात चांगले वातावरण नसेल, तर तुम्ही सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचे काही तुकडे टाका. मान्यतेनुसार असे केल्याने जीवनातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)
संबंधित बातम्या