Shravan 2024 Upay : यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर-कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.
जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्त्व आणि भगवानं शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय.
१०८ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ॐ सांब सदा शिवाय नम:चा सतत जप करावा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल.
पंडित धर्मेंद्र झा यांनी लाइव्ह हिंदुस्तान या वेबसाइटशी बोलताना श्रावण महिन्याचं महत्त्व सांगितलं. पुराणानुसार समुद्र मंथन श्रावण महिन्यात झाले. त्यावेळी समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर पडली. यापैकी १३ रत्ने आपापसात, देव-दानवांमध्ये वाटली गेली. त्यात विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं. भगवान शंकरानं गळ्यात हलाहलविष घातलं होतं. यामुळं भगवान शंकराचा कंठ निळा पडला, त्यामुळं भगवान शंकराला नीलकंठ म्हटलं गेलं. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली, तरीही तापमान कमी झालं नाही. तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे.
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते. हे सगळं विधीवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीभावानं, श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते.
१. शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात.
२. दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते.
३. उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला समृद्धी प्राप्त होते.
४. सुगंधी द्रवानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो.
५. साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते.
६. आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात.
७. गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो.
८. शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते.
९. तेलानं अभिषेक केल्यानं अडथळे नष्ट होतात.
१०. श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्यानं शत्रू संपून जातात.
संबंधित बातम्या