Rashtra Sant Tukdoji Maharaj Punya Tithi:
आपल्या काव्यातून देशसेवेचा, देशप्रेमाचा आणि विविधतेत एकतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा दिवस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव घेताच आपल्याला प्रथम आठवते ती त्यांची ग्रामगीता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुकडोजी महाराजांचा गौरव करताना म्हटले आहे की, देशातील ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल, तर तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे जा. संत तुकडोजी महाराज यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी, तसेच जातीभेद दूर व्हावेत यासाठी आपले काव्य, अभंग, कीर्तन आणि विचारांद्वारे प्रयत्न केले. महाराजांनी सर्वधर्मसमाभावाचाही सतत पुरस्कार केला. अशा या थोर संताची आज पुण्यतिथी. त्यांच्याविषयी जाणून घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करू या...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांचा जन्म १९०९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला, तर त्यांचे निर्वाण अमरावतीतील मोझरी येथे आश्विन वद्य पंचमीला (११ ऑक्टोबर) १९६८ साली झाला. महाराजांनी अमरावतीतील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना करत आपले समाजसेवेचे कार्य पुढे नेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे केलेल्या गुरुकुलाच्या स्थापनेचे कार्य हे त्यांच्या मोठ्या कार्यांपैकी एक मानले जाते.
> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावतीतील यावली येथे ठाकूर, ब्रह्मभय घराण्यात झाला.
> सन १९२५ मध्ये श्रीक्षेत्र सालबर्डीच्या घनदाट जंगलात विहार करत त्यांनी तेथे ध्यानसाधना केली.
> चंद्रपुरातील घनदाट जंगलात त्यांनी सन १९२५ मध्ये वन्यप्राण्यासोबत राहून निवास व साधना केली.
> २५ जुलै १९९६ रोजी महाराजांनी चंद्रपुरातील चिमूर येथे माणिक प्रसादिक बाळसमाज मंडळाची स्थापना केली.
> १९२७ मध्ये आनंदमृत आणि आत्मप्रभाव या अध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केले. > २७ ऑगस्ट १९२९ रोजी त्यांनी चिमूर येथे तुकड्यादासकृत प्रासादिक स्वरचित प्रथम भजनावलीचे प्रकाशन केले.
> १९३० साली ब्रिटिश सरकारने 'झूठी गुलामशाही क्या डर बता रही हैं' या महाराजांच्या भजनावर बंदी घातली.
> ४ एप्रिल १९३५ रोजी अमरावतीतील मोझरी येथे धर्म सेवाश्रमाची स्थापना केली.
> ३० मार्च १९३६ रोजी नागपूर येथे महाराजांचे भजन ऐकून प्रभावित झालेल्या महात्मा गांधी यांनी आपले मौन तोडले.
> १९४२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग.
> २८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांनी महाराजांना विदर्भातील क्रांतीचे प्रणेते म्हणून पहाटे ४ वाजता बंदी बनवले आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.
> २ डिसेंबर १९४२ रोजी ब्रिटिशांनी त्यांच्यावर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात प्रवेशबंदी घातली.
> १९४३ साली त्याच्या सेवा मंडळाने बंगाल प्रांतातील दुष्काळात सेवा केली.
> सन १९४३ ते १९४५ या काळात महाराजांनी बळीप्रथेवर बंदी, अस्पृश्यांना मंदिरप्रवेश, मादक पदार्थांवर बंदी, आखाड्याचे संघटन, दलित उद्धार, अंधश्रद्धा निर्मूलन अशा कार्यासाठी जनआंदोलन केले.
> १० मे १९४७ रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी सत्याग्रह करून साने गुरुजीसंह मंदिर प्रवेश.
> १० नोव्हेबर १९४७ रोजी रामटेक येथे राम मंदिर अस्पृश्य बांधवांसाठी खुले करण्यात आले.
> १३ ते १५ मार्च १९५३ या कालावधीत गुरुकुंज आश्रमात विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन.
> १ ते १२ मे १९५३ या काळात विनोबा भावे यांचया भूमी दान यज्ञात महाराजांचा सक्रिय सहभाग.
> १२ ते १७ मार्च १९५४ मध्ये सह्याद्री आणि सुरगुजा जिल्हयातील आदिवासी भागांमध्ये आदिवासी सुधार यात्रा काढली.
> जुलै १९५५ ते ऑगस्ट १९५५ या काळात मलेशिया, थायलंड, टोकियो, निको, हाँगकाँग, बँकॉक आणि ब्रह्मदेशाचा दौरा.
> २५ डिसेंबर १९५५ रोजी तुमसर येथील विदर्भ साहित्य संमेलनात 'ग्रामगीता' या ग्रंथाचे अनावरण
> १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळ येथे भूदान
> २० डिसेंबर १९६२ रोजी भारत-चीन युद्धाच्या वेळी नेफा सीमेवर भारतीय सैनिकांसमोर महाराजांचे भजन व भाषण.
> ३१ डिसेंबर १९६५ रोजी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पंजाब सीमेवर लाहोर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसमोर भाषण आणि भजन.
> ७ जुलै १९६८ रोजी पंढरपूरच्या हनुमान मंदिराच्या मैदानावर आषाढी एकादशीच्या पर्वावर महाराजांनी आपले अखेरचे भजन गायले.
> ११ ऑक्टोबर १९६८ रोजी ( आश्विनी वद्य पंचमी) महाराजांचे महानिर्वाण झाले.
> १२ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांच्या पार्थिवावर स्वामी सीतारामदास महाराज यांच्या हस्ते गुरुकुंज आश्रमात अंत्यसंस्कार झाले.
संबंधित बातम्या