Raksha Bandhan : रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये? जाणून घ्या काही खास गोष्टी आणि महत्वाचे नियम
मराठी बातम्या  /  धर्म  /  Raksha Bandhan : रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये? जाणून घ्या काही खास गोष्टी आणि महत्वाचे नियम

Raksha Bandhan : रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये? जाणून घ्या काही खास गोष्टी आणि महत्वाचे नियम

Updated Aug 17, 2024 05:10 PM IST

Raksha Bandhan 2024 Do's and Dont's : भाऊ-बहिणीचे अतुट नाते जपण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना शुभ आणि अशुभ मुहूर्तासह काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. वाचा राखी बांधण्याचे महत्वाचे नियम...

रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये? जाणून घ्या
रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये? जाणून घ्या

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. पंचांगानुसार, यावर्षी १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन हा सण सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगासह अतिशय शुभ योगांमध्ये साजरा केला जाईल. रक्षाबंधन हे पंचक आणि भद्राच्या प्रभावाखाली असेल. या काळात राखी बांधण्यास मनाई आहे. असे मानले जाते की, भावाला राखी बांधताना काही लहान-लहान चुका होऊ शकतात ज्याचा त्याच्या आणि तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी राखी बांधताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम...

शुभ मुहूर्तावर राखी बांधणे : 

ज्योतिष शास्त्रानुसार राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी भावाला रक्षासूत्र बांधावे. त्यामुळे शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्या. पंचांगानुसार या वर्षी राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३५ मिनिटे ते ६ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल.

प्रथम देवाला राखी बांधणे : 

रक्षाबंधनानिमित्त प्रथम देवाला राखी बांधावी. त्यांना अक्षत आणि तांदूळ लावून टिळा लावावा. मिठाई अर्पण करावी. यानंतर भावाला राखी बांधायला सुरुवात करा.

भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवा: 

हिंदू रीतिरिवाजांमध्ये, पूजा विधी दरम्यान डोके झाकले जाते. आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा टोपीने झाका.

तुटलेल्या तांदळाचा अक्षदा लावू नका :

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकवाचा टिळा आणि अक्षदा लावतात आणि नंतर त्याला राखी बांधतात, मात्र अक्षदा लावताना तांदूळ तुटलेला नाही ना, याची काळजी घ्यावी. तुटलेली अक्षदा अशुभ मानली जाते.

रक्षाबंधनामध्ये ३ गाठी बांधणे: 

असे मानले जाते की, राखी बांधताना भावाने रक्षासूत्रात ३ गाठी बांधल्या पाहिजेत. या गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात.

उजव्या हाताला राखी बांधा : 

ज्योतिष शास्त्रानुसार भावाला नेहमी उजव्या हाताला राखी बांधावी. उजवा हात कर्माशी संबंधित आहे. त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते.

आपल्या बहिणींचा आदर करा : 

रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावा-बहिणींना कोणत्याही प्रकारे रागावू नका. तसेच राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे हे लक्षात ठेवा. तसेच काळ्या रंगाचा वापर कमी करा.

 

Whats_app_banner