मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijaya Ekadashi 2023 : ‘विजय मिळवून देणारी एकादशी’ असं विजया एकादशीला का म्हणतात?

Vijaya Ekadashi 2023 : ‘विजय मिळवून देणारी एकादशी’ असं विजया एकादशीला का म्हणतात?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 11, 2023 08:46 AM IST

Importance Of Vijaya Ekadashi Vrat : असे म्हणतात की या शुभ तिथीला जो भक्त पूर्ण विधीपूर्वक व्रत करतो, तो त्याच्या प्रत्येक कार्यात यशस्वी होतो.

काय आहे विजया एकादशीचं महत्व
काय आहे विजया एकादशीचं महत्व (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Vijaya Ekadashi Vrat

येत्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी विजया एकादशी साजरी केली जाणार आहे.विजय मिळवून देणारी ही एकादशी आहे म्हणूनच याला विजया एकादशी असं म्हणतात. खरंतर प्रत्येक एकादशीचं आपलं असं एक वेगळं महत्व आहे. विजया एकादशीलाही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की या शुभ तिथीला जो भक्त पूर्ण विधीपूर्वक व्रत करतो, तो त्याच्या प्रत्येक कार्यात यशस्वी होतो.

काय आहे विजया एकादशीचं महत्व

सर्व व्रतांपैकी एकादशीचे व्रत सर्वात प्राचीन मानले जाते. पद्मपुराणानुसार, महादेवांनी नारदाला उपदेश करताना म्हटले होते की, 'एकादशी ही पुण्य देणारी आहे'. विजया एकादशीचे व्रत करणारी व्यक्ती आपल्या पितरांचा त्याग करून स्वर्गात जाते असे म्हटले जाते. त्याचबरोबर व्रत करणाऱ्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि त्याला त्याच्या मागील जन्माच्या तसेच या जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते.

काय आहे विजया एकादशीची कथा

असे म्हणतात की त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांनी समुद्र देवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती, परंतु समुद्र देवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही. वक्दलाभ्य मुनींच्या आदेशाने रामाने विजया एकादशीचे व्रत पाळले, ज्याचा प्रभाव असा झाला की, समुद्राला रामाला मार्ग द्यावा लागला. यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठीही उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून ही तारीख विजया एकादशी म्हणून ओळखली जाते.

विजया एकादशीचे व्रत आणि पूजा पद्धत

एकादशीच्या एक दिवस आधी एक वेदी बनवून त्यावर सात धान्ये ठेवावीत.

त्यावर सोने, चांदी, तांबे किंवा मातीचा कलश लावा

एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत करावे.

भगवान विष्णूची मूर्ती पंचधातूच्या कलशात ठेवून त्याची स्थापना करा.

धूप, दीप, चंदन, फळे, फुले आणि तुळस इत्यादींनी श्री हरीची पूजा करावी.

उपवासासह हरिकथा पाठ करा आणि ऐका.

रात्री जागे राहून श्री हरी नामाचा जप करा.

द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा आणि कलश दान करा.

त्यानंतर उपवास सोडावा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

 

WhatsApp channel

विभाग