Datta Jayanti : श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीदत्त जयंतीचं काय आहे महत्व,कशी कराल श्री दत्तांची पूजा
Importance Of Shree Datta Jayanti : ७ डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि साध्या नावाचे दोन शुभ योग दिवसभर राहणार आहेत, त्यामुळे या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा बुधवारी म्हणजेच ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सुरु होईल ही पौर्णिमा ८ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत चालेल. प्रदोषकाळात म्हणजेच संध्याकाळी दत्त गुरुंची पूजा केली जाते. ७ डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि साध्या नावाचे दोन शुभ योग दिवसभर राहणार आहेत, त्यामुळे या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक मानले जातात. ते एक ऋषी आहेत ज्यांना गुरूशिवाय ज्ञान प्राप्त झाले. महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा केली जाते. भक्त एक दिवसभर उपवास करतात आणि भगवान दत्तात्रेयांची पूजा करण्यासाठी ध्यान करतात.अध्यात्मिक दृष्टिकोनातून, दत्तात्रेयांचे तीन शीरं सत्त्व, रजस आणि तम या तीन गुणांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्याचे सहा हात यम (नियंत्रण), नियम (नियम), साम (समानता), डुमा (शक्ती), दया यांचे प्रतिनिधित्व करतात.
दत्त गुरुंचे मुख्य ठिकाण कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे आहे. जिथे हजारो-लाखो भाविक येतात. भगवान दत्तात्रेयांचा उल्लेख ब्रह्मा, विष्णू आणि महेशच्या रूपात आढळतो. भगवान दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र होते. त्यामुळे त्यांना ‘स्मृतीमात्रानुगंता’ आणि ‘स्मृतरुगामी’ म्हणून ओळखले जाते.
कशी कराल पूजा
या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्री-पुरुषांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
त्यानंतर पूजेसाठी कोणत्याही एका ठिकाणी गंगाजल शिंपडून त्यावर लाल रंगाचे कापड पसरवावे.
त्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती स्थापित करून त्यांची फुले, फळे, चंदन, माळा, तांदूळ, नैवेद्य, धूप, दिवा इत्यादी अर्पण करून विधिवत पूजा करावी.
भगवान दत्तात्रेय (त्रिदेव) यांच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावा.
पूर्ण पूजा केल्यानंतर, भगवान दत्तात्रेय व्रताची कथा ऐका, त्यानंतर भगवान दत्तात्रेयांची आरती करावी.
आरती झाल्यावर प्रसाद अर्पण करून सर्वांना वाटावा. आणि ब्राह्मणाला खाऊ घालून आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन त्याचा निरोप घ्या.
त्यानंतर स्वतः अन्न ग्रहण करा.
संबंधित बातम्या