आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की हा दिवस वेद व्यासजींची जयंती म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. याशिवाय या दिवशी गुरुंची पूजा करण्याचेही महत्त्व आहे.
यावेळी गुरुपौर्णिमेच्या तारखेबाबत संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊया की यंदा गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाईल. तसेच शुभ वेळ, महत्त्व आणि पूजेची पद्धतही जाणून घेऊया.
पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी २० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि २१ जुलै रोजी दुपारी ३:४७ वाजता समाप्त होईल. शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार पौर्णिमेचे व्रत चंद्रोदय व्यापिनी पौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते. यामध्ये देखील पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास व पूजा केली जाते. त्यामुळे २० जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार असून २१ तारखेला गुरु पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यात येणार आहे.
१) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूचे ध्यान करावे.
२) देवघराची पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यावर तिलक लावून व्रताची शपथ घ्या.
३) भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे. भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मी आणि वेद व्यास यांची देखील पूजा करा.
४) यानंतर गुरु चालिसा पाठ करा.
५) भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेद व्यास यांना मिठाई, फळे आणि खीर इत्यादी अर्पण करा. तसेच गुरु पौर्णिमा व्रत कथेचे पठण करावे.
६) शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करावी.
पौराणिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी वेद व्यासजींनी ४ वेदांची रचना केली होती, अशीही एक मान्यता आहे. या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात. या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. याचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या