Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
आयुष्य खूप लहान आहे
धन-दौलत कोण कोणाला देत नसतं
प्रेमाने गोड बोलत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
फक्त माणुसकी जपत रहा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन!
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ!
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!
डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हृदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
शुभ सकाळ!
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ!
उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ!
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ!
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ!
मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!
भविष्याची जराही कल्पना नसताना
आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन
करतो तोच खरा मनाचा
“आत्मविश्वास”
शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या