Good Morning Marathi Message: एखाद्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !
नवा दिवस नवी सुरूवात
नवी प्रेरणा आणि तुमची साथ
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वरा मी यासाठी कृतज्ञ आहे!
शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!! शुभ सकाळ !!
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
शुभ सकाळ
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!
सुखाची अपेक्षा असेल…
तर दुःख ही भोगावे लागेल…
प्रश्न विचारावयाचे असतील
तर उत्तर हि द्यावे लागेल…
हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…
जीवनात यश हवे असेल…
तर संकटांना सामोरे जावेच लागेल.
शुभ सकाळ
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे.
नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे…
शुभ सकाळ
संबंधित बातम्या