Geeta Updesh : प्रत्येकाला देतील भरपूर प्रेरणा; गीतेच्या 'या' ५ शिकवणी नेहमी ठेवा लक्षात!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : प्रत्येकाला देतील भरपूर प्रेरणा; गीतेच्या 'या' ५ शिकवणी नेहमी ठेवा लक्षात!

Geeta Updesh : प्रत्येकाला देतील भरपूर प्रेरणा; गीतेच्या 'या' ५ शिकवणी नेहमी ठेवा लक्षात!

Feb 02, 2025 08:15 AM IST

Geeta Teachings In Marathi : कुरुक्षेत्राच्या रणांगणात श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या शिकवणीच्या मदतीने मार्गदर्शन केले. तीच श्रीमद भागवत गीता तुम्हालाही जीवनात मार्गदर्शन करेल.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi : प्रत्येक नवीन दिवस काही आव्हाने आणि संघर्ष घेऊन येतो. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही या संघर्षांना आणि आव्हानांना अगदी सहज सामोरे जाऊ शकता. पण, योग्य मार्गदर्शन कुठून मिळणार आणि कोण देणार हा प्रश्न मनात निर्माण होतो. याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या शिकवणीच्या मदतीने मार्गदर्शन केले. तीच श्रीमद भागवत गीता तुम्हालाही जीवनात मार्गदर्शन करेल. जो माणूस भगवद्गीता नीट वाचतो, त्याचे मन आयुष्यभर भटकत नाही. अशा परिस्थितीत, गीतेचे कोणते उपदेश तुम्हाला प्रेरित ठेवतील हे जाणून घेऊया.

काय सांगतात भगवान श्रीकृष्ण?

> श्रीमद भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की, बदल कसे स्वीकारायचे हे माणसाला कळले पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल प्रत्येक परिस्थितीत होतो आणि या बदलांसोबत समाज आणि माणसंही बदलत राहतात. अशा परिस्थितीत माणसाने परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जावे. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले पाहिजे.

> भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, माणसाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करत राहिले पाहिजे. माणसाने रात्रंदिवस परिश्रम करून त्याला हवे ते साध्य केले पाहिजे, कारण जो माणूस आपले काम समर्पण आणि एकाग्रतेने करतो त्याला एक दिवस यश नक्कीच मिळते.

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाच्या 'या' ५ गोष्टींमुळे जीवनात मिळते यश, अगदी कठीण ध्येयेही होतात साध्य !

> श्री कृष्ण म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्याला स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा चांगल्या प्रकारे माहित आहे. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल. मात्र यासाठी प्रत्येक परिस्थितीत स्वत:वरचा विश्वास कायम ठेवा. माणसाने आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शंका घेऊ नये.

> श्रीमद्भगवद्गीतेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या यशाची पहिली पायरी म्हणजे शिस्त. जो आपले जीवन शिस्तीने जगतो तो प्रत्येक कामात यशस्वी होतो. शिस्तबद्ध जीवन जगल्याने प्रत्येक काम एकामागून एक पूर्ण होते.

> गीतेच्या शिकवणीत असे सांगितले आहे की, माणसाने आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेतले पाहिजे. जो माणूस आपल्या मनावर विजय मिळवतो, तो जगातील सर्व लढाया जिंकू शकतो. मनाचा ताबा जिंकणारा माणूस प्रत्येक कामात यशस्वी होतो.

Whats_app_banner