Geeta Updesh : कधीही करू नका गर्व; अन्यथा यशात येईल अडथळा! गीता उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : कधीही करू नका गर्व; अन्यथा यशात येईल अडथळा! गीता उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात...

Geeta Updesh : कधीही करू नका गर्व; अन्यथा यशात येईल अडथळा! गीता उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात...

Oct 15, 2024 07:53 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीतेची शिकवण अंगीकारणारा प्रत्येक माणूस एक चांगला व्यक्ती बनतो. यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi : आपण सर्वजण लहानपणापासून श्रीमद्भगवद्गीतेविषयी ऐकत आलो आहोत, जो सनातन धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. धर्मयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे संपूर्ण वर्णन त्यात करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला अवघ्या ४५ मिनिटांत दिलेला गीता उपदेश आजही लोक ऐकतात. महाभारताची लढाई ही धर्म आणि अधर्माबाबत होती, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील लोक दोन्ही बाजूंनी लढत होते. अशा परिस्थितीत अर्जुनला आपल्याच लोकांविरुद्ध शस्त्र उचलायचे नव्हते. त्याला आपले मित्र, शिक्षक आणि नातेवाईकांविरुद्ध शस्त्र वापरायचे नव्हते. परंतु, हे युद्ध अटळ होते. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे रहस्य सांगितले आणि विश्वरूप प्रकट करून त्याच्या मनातील दुविधा दूर केली. त्यानंतर कुरुक्षेत्राच्या भूमीवर १८ दिवसांची लढाई झाली. यावेळी पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला. यानंतर अखंड भारताची निर्मिती झाली.

भगवद्गीता हा ग्रंथ १८ अध्याय आणि ७०० श्लोकांमध्ये विभागलेला आहे. गीता संस्कृत भाषेत लिहिली गेली होती. परंतु, आता ती इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळसह इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. गीतेची शिकवण अंगीकारणारा प्रत्येक माणूस चांगला माणूस बनतो. यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत. आज आपण गीता उपदेशात दिलेल्या अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही तुमचे जीवन चांगले बनवू शकता.

काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण?

> गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की, माणसाने कधीही कुणाशी उद्धटपणे बोलून कोणाचे मन दुखवू नये, कारण वेळ गर्वाचे घर खाली करते आणि कोणाच्याही समोर बोलण्यासारखे ठेवत नाही.

> भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला समजावून सांगितले होते की, धैर्यवान लोक भूतकाळाबद्दल कधीही पश्चात्ताप करत नाहीत. परंतु, भविष्याचा विचार करतात आणि परिस्थिती त्यांच्या बाजूने सुधारण्याचा प्रयत्न करतात.

Geeta Updesh : गरीबलाही धनवान बनवू शकतात ‘हे’ गीता उपदेश! भगवान श्रीकृष्णाची ही शिकवण माहितीय?

> माणसाने सर्वांची सेवा करावी, पण कोणाकडूनही आशा ठेवू नये, असे गीतेच्या शिकवणुकीत सांगितले आहे. कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो. त्याचा मोबदला कोणताही मनुष्य कधीही देऊ शकत नाही.

> माधवाच्या म्हणण्यानुसार, काहीही मिळाल्यावर अहंकार बाळगू नये. कारण देणारा आणि घेणारा एकच आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही चांगली गोष्ट मिळत असेल, तर डोळे बंद करून देवावर विश्वास ठेवा आणि ती गोष्ट स्वीकारा.

> गीताज्ञानात सांगितले आहे की, तुमच्या दुःखासाठी जगाला कधीही दोष देऊ नका, तर ते समजून घेऊन तुमचा विचार बदला. कारण हा तुमच्या दुःखाचा अंत आहे.

Whats_app_banner