Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आनंदी जीवनाचे रहस्य; दु:ख तुमच्या आजूबाजूला भटकणारही नाही!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आनंदी जीवनाचे रहस्य; दु:ख तुमच्या आजूबाजूला भटकणारही नाही!

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आनंदी जीवनाचे रहस्य; दु:ख तुमच्या आजूबाजूला भटकणारही नाही!

Published Feb 15, 2025 07:58 AM IST

Geeta Updesh In Marathi :आजच्या धावपळीच्या जीवनात आनंदी राहणे हे एक कठीण काम आहे. अशा परिस्थितीत, भगवद्गीतेतील शिकवणी आत्मसात करून तुम्ही जीवनात आनंद अनुभवू शकता.

गीता उपदेश
गीता उपदेश (Pixabay )

Geeta Updesh In Marathi : गीतेची शिकवण ही प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेले ज्ञान आहे. भगवद्गीतेची ओळख केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर ती परदेशातही वाचली आणि आत्मसात केली जात आहे. गीतेत वर्णन केले आहे की, भगवान श्रीकृष्ण माणसाला आनंदी राहण्याचे काही मार्ग सांगतात. याबद्दल आपणही जाणून घेऊया...

या सवयी सोडून द्या

भगवद्गीतेत, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल, तर त्याने इतरांची टीका करण्यापासून दूर राहिले पाहिजे. यासोबतच, इतरांबद्दल अनावश्यक तक्रार करणे थांबवा. तरच तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकता.

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली

बऱ्याचदा माणूस प्रत्येक गोष्टीत स्वतःची इतरांशी तुलना करत राहतो. या संदर्भात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जो स्वतःची इतरांशी तुलना करत नाही तोच जीवनात आनंदी राहू शकतो. आनंदी राहण्याचा मूळ मंत्र म्हणजे स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणे.

Geeta Updesh : आपले मन दुखावण्याऱ्या व्यक्तीशी कसं वागावं? गीता उपदेशात भगवान श्रीकृष्ण काय सांगतात?

कोणतेही दुःख त्रास देणार नाही

गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले की, माणसाने कोणतेही काम निःस्वार्थपणे करावे. याचा अर्थ असा की, तुम्ही कोणतेही काम फळाची अपेक्षा न करता केले पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही शिकवण तुमच्या आयुष्यात अंमलात आणली तर तुमच्या आयुष्यात दुःखाला जागा राहणार नाही.

असा माणूस आनंदी नाही.

जे घडले त्यावर आपले नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत, जो माणूस भूतकाळाबद्दल विचार करत राहतो, तो आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही. या संदर्भात, गीतेत म्हटले आहे की जर तुम्ही भूतकाळातील आठवणी तुमच्यासोबत घेऊन जात राहिलात, तर तुम्ही आयुष्यात कधीही आनंदी राहू शकणार नाही. म्हणून शक्य तितक्या लवकर भूतकाळ विसरून जीवनात पुढे जा.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner