Geeta Updesh In Marathi : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या उपदेशांचे वर्णन केले आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाची पावले डळमळू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा पाठ शिकवला. गीता उपदेशांची प्रासंगिकता जितकी द्वापार युगात होती तितकीच कलियुगातही आहे. गीतेची शिकवण मानवाच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देण्याचे काम करते. सर्व बाजूंनी निराशा आणनैराश्य दिसलं की, श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केले पाहिजे. गीतेच्या शिकवणीच्या मदतीने भगवान श्रीकृष्ण आनंदी राहण्याचे मार्ग सांगतात. अशा परिस्थितीत, जीवनात आनंदी राहण्यासाठी व्यक्तीने कोणत्या शिकवणी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
> भगवान श्रीकृष्ण गीतेच्या शिकवणीच्या सहाय्याने स्पष्ट करतात की, जर माणसाला आनंदी व्हायचे असेल तर, त्याने इतरांवर टीका करू नये. तसेच, व्यक्तीने इतरांबद्दल तक्रार करणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीने इतरांवर टीका करण्यात आणि तक्रारी करण्यात खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या विकासासाठी अधिक वेळ घालवला, तर अधिक चांगले होईल. स्वतःला दिलेला वेळ नेहमीच सत्कारणी लागतो. प्रत्येक व्यक्तीने नेहमी आत्मपरिक्षण करायलाच हवे.
> गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की, व्यक्तीने स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नये. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःची इतरांशी तुलना केली तर तो कधीही आनंदी होणार नाही. अशा परिस्थितीत माणसाने स्वतःची इतरांशी तुलना करण्याची सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे. तुलना ही केवळ आपल्या यशाच्या वाटेत अडथळा निर्माण करणारी गोष्ट ठरू शकते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करण्यावर भर द्यावा.
> भगवान श्रीकृष्णाच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला आनंदी व्हायचे असेल तर त्याने भूतकाळातील गोष्टींची चिंता करणे सोडून दिले पाहिजे. जो माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून राहतो तो आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत माणसाने आपल्या भूतकाळातील आठवणी मागे सोडून पुढे जावे, असे गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे. भूतकाळ मागे सोडला, तरच भविष्यकाळाचा विचार करता येईल. अन्यथा व्यक्तीची प्रगती होणे कठीण आहे.
> श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, जर माणसाला आनंदी व्हायचे असेल तर त्याने फक्त त्याचे कर्म लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या कृतींच्या परिणामांची चिंता करू नये. परिणामाची चिंता न बाळगता काम करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच निराश होत नाही.
संबंधित बातम्या