Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी कायम ठेवा लक्षात; आयुष्यात येईल आनंदाची लाट!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी कायम ठेवा लक्षात; आयुष्यात येईल आनंदाची लाट!

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी कायम ठेवा लक्षात; आयुष्यात येईल आनंदाची लाट!

Published Oct 31, 2024 06:03 AM IST

Geeta Updesh In Marathi: अर्जुनाला आपल्या विश्व रूपाचे दर्शन देऊन भगवंताने हे दाखवून दिले की, तोच विश्वाचा निर्माता आणि नियंत्रक आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे.

Geeta Updesh In Marathi : गीता उपदेश
Geeta Updesh In Marathi : गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi : हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन आहे. महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. यात एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, जे संस्कृत भाषेत लिहिले गेले होते. आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता, जेव्हा तो आपल्या नातेवाईक आणि गुरुंविरुद्ध लढण्यापूर्वी नैतिक संकटात होता. आपल्या प्रियजनांना युद्ध भूमीत पाहून अर्जुन अत्यंत दुःखी आणि व्याकूळ झाला होता. यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितले की, राज्याला सर्वोत्तम राजा देणे आणि अन्याय थांबवणे हे त्याचे कर्तव्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला हे देखील शिकवले की, काम करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे, परंतु त्याच्या परिणामाची चिंता करणे नाही. अर्जुनाला आपल्या विश्व रूपाचे दर्शन देऊन भगवंताने हे दाखवून दिले की, तोच विश्वाचा निर्माता आणि नियंत्रक आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे. यानंतर महाभारताचे हे युद्ध १८ दिवस चालले आणि शेवटी पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गीता प्रवचनात नमूद केलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत.

‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा!

> गीतेच्या शिकवणीनुसार माणसाने नेहमी राग आणि अहंकार टाळला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले की, क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. क्रोधाने बुद्धीचा नाश होतो आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो, तेव्हा माणूस आपले कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही. क्रोधामुळे, व्यक्ती स्वतःवर नियंत्रण गमावते, ज्यामुळे तो स्वतःचे नुकसान करतो.

Geeta Updesh : गंगेतही धुतले जात नाही या प्रकारचे पाप! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…

> गीतेच्या शिकवणीनुसार, जीवनात घेतलेले निर्णय आणि कृती आपले भविष्य घडवतात. माधव अर्जुनला सांगतात की, आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे. कारण आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, पण एका मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.

> गीतेच्या शिकवणीनुसार, एखाद्या मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो काही काळ रडतो, परंतु जर त्याला संस्कार दिले नाहीत तर तो आयुष्यभर रडतो. आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. मुलांनी जीवनात आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत हे शिकवणे त्यांचे जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी आवश्यक आहे.

> गीतेच्या शिकवणीनुसार, आपली विचारसरणी, आपले आचरण आणि आपली कृती, देव नव्हे तर आपले भाग्य लिहितो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगितले की, माणसाचे कर्म त्याचे भाग्य ठरवते.

> गीतेच्या शिकवणीनुसार वडिलांनी शिकवण दिलेला मुलगा, गुरूंनी दिलेला शिष्य आणि सोनाराने टोचलेले कान हे नेहमीच ‘दागिना’ अर्थात श्रेष्ठ बनतात.

Whats_app_banner