Geeta Updesh : मन भरकटत असेल तर गीतेच्या 'या' ५ शिकवणी लक्षात ठेवा! जाणून घ्या काय सांगतात...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : मन भरकटत असेल तर गीतेच्या 'या' ५ शिकवणी लक्षात ठेवा! जाणून घ्या काय सांगतात...

Geeta Updesh : मन भरकटत असेल तर गीतेच्या 'या' ५ शिकवणी लक्षात ठेवा! जाणून घ्या काय सांगतात...

Jan 23, 2025 08:18 AM IST

Geeta Teaching In Marathi : गीतेमध्येच अशा काही शिकवण आहेत ज्यामुळे मन शांत होते. मन भरकटायला लागले तर श्रीमद भागवत गीतेच्या या शिकवणीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे.

मन भरकटत असेल तर गीतेच्या 'या' ५ शिकवणी लक्षात ठेवा! जाणून घ्या काय सांगतात...
मन भरकटत असेल तर गीतेच्या 'या' ५ शिकवणी लक्षात ठेवा! जाणून घ्या काय सांगतात...

Geeta Updesh In Marathi : श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जीवन जगण्याची कला स्पष्ट केली आहे. जी व्यक्ती गीतेचे सार आपल्या जीवनात अंमलात आणते, ती एक दिवस नक्कीच यशस्वी होते. रणांगणातून अर्जुनचे मन डळमळू लागले, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश सांगितला. हे ऐकून तो रणांगणात युद्धासाठी सज्ज झाला. असे मानले जाते की, जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भागवत गीतेत सापडते. गीतेची शिकवण लोकांसाठी मार्गदर्शक ठरते. अशा स्थितीत गीतेमध्येच अशा काही शिकवण आहेत, ज्यामुळे मन शांत होते. मन भरकटायला लागले तर श्रीमद भागवत गीतेच्या या शिकवणीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे.

परिणामांची चिंता न करता काम करा

श्रीमद भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की, मनुष्याने परिणामाची चिंता न करता कार्य करावे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही काम त्याच्या परिणामाची चिंता न करता करते तेव्हा त्याचे मन शांत राहते. मन फारसे भटकत नाही. यामुळे व्यक्ती तणावमुक्त राहते आणि आपले काम व्यवस्थित करू शकते.

स्वार्थाशिवाय काम करा

गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की, व्यक्तीने कोणतेही काम कोणत्याही स्वार्थाशिवाय करावे. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही इच्छा किंवा स्वार्थापोटी कोणतेही काम केले तर त्याचे मन कधीही शांत राहत नाही. त्याचे मन नेहमी अस्थिर असते.

Geeta Updesh : 'या' गोष्टींचा अभिमान पडू शकतो महागात, लवकरात लवकर सुधारा तुमच्या सवयी!

सुख-दु:खात सारखीच भावना

सुख आणि दु:ख हे एका चक्रासारखे आहे. जे मानवी जीवनात येतच असतात. अशा स्थितीत माणूस सुख-दु:खात समान राहिला तर त्याचे मन फारसे भटकत नाही. गीतेत सांगितले आहे की माणसाने सुखात अहंकारी नसावे आणि दु:खातही विचलित होऊ नये.

देवावर विश्वास ठेवा

श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितले आहे की, माणसाची ईश्वरावर श्रद्धा असावी. देवावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीचे मन फारसे अस्वस्थ होत नाही. देव सगळं काही टारून नेईल, जे तुमच्या वाटचे आहे, ते तुम्हाला नक्की मिळेल, यावर श्रद्धा ठेवा.

ज्ञान मिळवा

श्रीमद भागवत गीतेनुसार ज्ञान प्राप्त करण्यात मग्न असलेल्या व्यक्तीचे मन फारसे भटकत नाही. त्याचे मन स्थिर राहते.त्यामुळे नेहमी ज्ञान मिळवत राहा आणि नव्या गोष्टी शिकत राहा.

Whats_app_banner