Geeta Updesh: मनातील भीती कशी दूर करायची? स्वतः श्रीकृष्णानं दिलंय उत्तर! जाणून घ्या ‘हा’ अनमोल मंत्र
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: मनातील भीती कशी दूर करायची? स्वतः श्रीकृष्णानं दिलंय उत्तर! जाणून घ्या ‘हा’ अनमोल मंत्र

Geeta Updesh: मनातील भीती कशी दूर करायची? स्वतः श्रीकृष्णानं दिलंय उत्तर! जाणून घ्या ‘हा’ अनमोल मंत्र

Published Oct 08, 2024 08:06 AM IST

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाची शिकवण आहे जी मनुष्याला जीवनमूल्ये सांगते. गीता हे जीवनाचे तत्वज्ञान असून त्याचे पालन करणारा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतो.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेची शिकवण जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते. गीतेत श्रीकृष्णाने भय दूर करण्याचा एकमेव उपाय सांगितला आहे.

भीती दूर करण्याचा मार्ग कोणता?

> भगवान श्रीकृष्ण गीता उपदेश करताना म्हणतात की, दुसऱ्याने सांगितलेल्या किंवा नेमून दिलेल्या कर्तव्याचे पालन करण्यात भीती असते आणि स्वतःच्या कर्मधर्माने आलेले मरणही चांगले असते. म्हणजे इतरांचे अनुकरण किंवा कॉपी करण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण ओळखून कर्म करायला शिकले पाहिजे. इतरांना फॉलो करत राहिल्यास मनात भीती निर्माण होते. श्रीकृष्णाच्या मते, भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःचा धर्म ओळखून, त्याच्या तत्त्वांवर चालणे.

> गीता उपदेशाच्या मते, तुम्हाला काय हवे आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि ते साध्य करण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य समर्पित करा, हाचा खरा धर्म आहे.

Geeta Updesh: भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलाय धर्माचा खरा अर्थ! जाणून घ्या भगवंताचे ‘हे’ अनमोल उपदेश

> भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, आपले मानवी शरीर हे नश्वर आहे. पण, आपला आत्मा हा अमर आहे. ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटत असेल, तर तो निरुपयोगी आहे. शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करायला हवा.

> तुम्ही आनंदी आहात की दुःखी, दोन्ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. जर, तुम्हाला नेहमी आनंदी रहायचे असेल, तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहाल. आणि मनात नेहमी आनंदी व सकारात्मक विचार ठेवाल. मात्र, जर तुम्ही नकारात्मक विचार मनात आणाल, तर तुम्ही दुःखी व्हाल. विचार हेच प्रत्येक माणसाचे शत्रू आणि मित्र असतात.

> कोणासोबत चालल्याने किंवा कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्याने ना आनंद मिळतो, ना कोणतेच ध्येय. म्हणून माणसाने नेहमी एकटेच चालले पाहिजे आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे.

Whats_app_banner