Geeta Updesh : आपले मन दुखावणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे? गीतेत काय सांगितलंय? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : आपले मन दुखावणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे? गीतेत काय सांगितलंय? जाणून घ्या...

Geeta Updesh : आपले मन दुखावणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे? गीतेत काय सांगितलंय? जाणून घ्या...

Published Oct 05, 2024 07:49 AM IST

Geeta Updesh In Marathi :हिंदू धर्मातील सर्व धर्मग्रंथांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. श्रीमद्भगवद्गीतेद्वारे व्यक्तीला आपल्या जीवनात मोक्ष प्राप्त होऊ शकतो.

गीता उपदेश
गीता उपदेश

हिंदू धर्मातील सर्व धर्मग्रंथांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. श्रीमद्भगवद्गीतेद्वारे व्यक्तीला आपल्या जीवनात मोक्ष प्राप्त होऊ शकतो. यासाठी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या जीवनातील मुख्य शिकवणींची सविस्तर माहिती घेऊया. श्रीमद्भगवद्गीता हा हिंदू धर्मातील एक धर्मग्रंथ आहे. १८ अध्याय आणि ७०० श्लोक असलेल्या या ग्रंथातील ज्ञान जो कोणी आपल्या जीवनात अंगीकारतो तो व्यक्ती आयुष्यात खरेपणाने वागू लागतो. 

महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुन जेव्हा रणांगणात शस्त्रे घेऊन, आपल्याच लोकांविरुद्ध उभा राहत नव्हता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप प्रकट करून त्याला जीवनाचे रहस्य सांगितले. खरे तर हे युद्ध धर्म आणि अधर्माचे होते. गीतेचे ज्ञान देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, मनुष्याने फळाची चिंता न करता आपले कार्य करत राहावे, त्याचे फळ भगवंत स्वतः देईल. त्यानंतर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला. त्यामुळे गीतेच्या या सल्ल्यानुसार आज आपण जाणून घेऊया की, आपल्याशी वाईट वागणाऱ्या आणि आपले मन दुखावणाऱ्या व्यक्तीशी आपण कसे वागले पाहिजे? आणि भगवान श्रीकृष्ण याबद्दल काय सांगतात...

Geeta Updesh: तुमचं प्रेम केवळ मोह तर नाही ना? गीतेच्या ‘या’ शिकवणुकीमुळे बदलेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

भगवान श्रीकृष्ण म्हणतात...

गीतेच्या शिकवणीनुसार, जेव्हा कोणी तुम्हाला दुखावेल किंवा खाली आणण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला शांत ठेवावे लागेल. गीतेची शिकवण सांगते की, समोरची व्यक्ती तुमच्याशी जे काही करत आहे, ते त्याचे दुर्भाग्य आहे. तो व्यक्ती स्वतः स्वतःसाठी पापाचा खड्डा खणत आहे. देव स्वत: त्याला याचे फळ नक्की देईल. म्हणून इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका.

गीतेमध्ये असेही म्हटले आहे की, जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला क्षमा करा आणि नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. गीतेच्या शिकवणीनुसार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर कोणी तुमचा अपमान करत असेल, तर तो कधीही वैयक्तिकरित्या घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. गीतेमध्ये दिलेल्या शिकवणीनुसार, एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीचा अपमान केल्यावर, त्या व्यक्तीने त्वरित उत्तर देऊच नये. किंबहुना गीता उपदेशानुसार त्या कृतीच्या परिणामांचा भविष्यात काय होईल विचार करायला हवा. जर तुम्ही गीतेची शिकवण पाळत असाल, तर एखाद्याने तुमचा अपमान केला, तरी त्यावर टीका करू नका. तर, त्याला समजावण्याचा प्रयत्न करा आणि जर तो सहमत नसेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

Whats_app_banner