Geeta Updesh : सगळीकडे अडचणी दिसतायत? मार्ग मिळत नाहीये? गीतेच्या 'या' शिकवणी सोडवतील समस्या!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : सगळीकडे अडचणी दिसतायत? मार्ग मिळत नाहीये? गीतेच्या 'या' शिकवणी सोडवतील समस्या!

Geeta Updesh : सगळीकडे अडचणी दिसतायत? मार्ग मिळत नाहीये? गीतेच्या 'या' शिकवणी सोडवतील समस्या!

Jan 28, 2025 07:56 AM IST

Geeta Teachings In Marathi : जेव्हा सर्वत्र अडचणी दिसतात, तेव्हा गीतेची ही शिकवण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही शिकवण तुम्हाला अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करेल.

सगळीकडे अडचणी दिसतायत? मार्ग मिळत नाहीये? गीतेच्या 'या' शिकवणी सोडवतील समस्या!
सगळीकडे अडचणी दिसतायत? मार्ग मिळत नाहीये? गीतेच्या 'या' शिकवणी सोडवतील समस्या!

Geeta Updesh In Marathi : जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाला कठोर परिश्रम करावे लागतात. पण अनेक वेळा मेहनत घेऊन आणि झोकून देऊनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे व्यक्ती निराश आणि दुःखी होते. त्याच्या मनात अनेक चुकीचे विचार येऊ लागतात आणि एक चुकीचे पाऊल तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकते. जेव्हा मन भरकटायला लागते आणि जीवनात काहीही समजत नाही, तेव्हा माणसाला श्रीमद्भगवद्गीता वाचण्याचा सल्ला दिला जातो. गीता वाचल्याने माणसाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा परिस्थितीत, जेव्हा सर्वत्र अडचणी दिसू लागतात, मार्ग सापडत नाही, तेव्हा गीतेची ही शिकवण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही शिकवणच तुम्हाला अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करेल.

तुमचे मन शांत ठेवा

श्रीमद्भगवद्गीतेनुसार, जीवनात कोणतीही परिस्थिती उद्भवली, तरी माणसाने राग येणे टाळले पाहिजे. रागावलेला माणूस उत्तम कामही खराब करू शकतो. असं म्हणतात की राग माणसासाठी नरकाचे दरवाजे उघडतो.

परिणामांची चिंता न करता काम करा

पुष्कळ वेळा असे घडते की, चांगले कर्म करूनही माणसाला अपेक्षित फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत माणसाने निराश होऊ नये, कारण श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनुष्याने परिणामांची चिंता न करता काम करत राहावे.

Geeta Updesh : गीतेच्या 'या' ६ शिकवणी बदलतील तुमचे आयुष्य, काय सांगतात श्रीकृष्ण एकदा वाचाच!

नियोजनबद्ध पद्धतीने काम करा

श्रीमद्भगवद्गीतेनुसार माणसाने कोणतेही काम नियोजनपूर्वक केले पाहिजे. त्यामुळे कामात अडथळा येत नाही. अशा स्थितीत कामाचे नियोजन न केल्यास त्या व्यक्तीला कामात अपयश येण्याची शक्यता असते.

देवावर विश्वास ठेवा

कष्ट करूनही काम होत नाही तेव्हा माणूस हतबल होतो. व्यक्ती पुन्हा काम करण्याची हिंमत दाखवू शकत नाही. अशा स्थितीत माणसाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे. देवावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण देव अशा लोकांच्या पाठीशी असतो.

श्रीमद भगवद् गीता माणसाला जीवनाची योग्य दिशा दाखवते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणात योग्य निर्णय घेण्यासाठी गीतेची शिकवण तर दिलीच, पण व्यक्तिशः आपले महान रूपही दाखवले, द्वापार युगात भगवान श्री कृष्णाने दिलेली शिकवण आजही मानवाला सुख, शांती आणि मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. अशा परिस्थितीत आपण गीतेच्या शिकवणींचे पालन केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल.

Whats_app_banner