Geeta Updesh : या गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर विनाश अटळ आहे! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : या गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर विनाश अटळ आहे! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात...

Geeta Updesh : या गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर विनाश अटळ आहे! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात...

Published Sep 12, 2024 10:03 AM IST

Geeta Updesh In Marathi : महाभारत युद्धाच्या वेळी कृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. गीतेचे वचन मानवासाठी हितकारक आहे. यामध्ये श्रीकृष्णाने मनुष्याचा विनाश कधी सुरू होतो हे सांगितले आहे.

गीता उपदेश
गीता उपदेश

श्रीमद्भागवत गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केला होता. माणसाला जगण्याचा योग्य मार्ग सांगणारे हे एकमेव पुस्तक आहे. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. 

श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेचे उपदेश जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने मानवाचा विनाश कधी सुरू होतो हे सांगितले आहे.

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।सङ्गात् संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते !

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति !

विषयांचं चिंतन करणाऱ्याला विषयांबद्दल आसक्ती निर्माण होते, आसक्ती मुळे काम निर्माण होतो, कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळे मोह उत्पन्न होतो, मोहापासून स्मृतीभ्रंश होतो, स्मृतीभ्रंश झाला की बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचा विनाश होतो !!

श्रीकृष्णाची अनमोल शिकवण

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणसाने कधीही अहंकारी राहू नये. अहंकार माणसाला प्रत्येक गोष्ट करायला लावतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण बनतो. त्यामुळे आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडला पाहिजे.

श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की कोणत्याही व्यक्तीचे पतन तेव्हा होते जेव्हा तो आपल्याच लोकांचेच पाय ओढतो किंवा त्यांना वाईट दृष्टीने बघतो आणि अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेऊ लागतो.

गीतेत लिहिले आहे, साध्या माणसाशी केलेली फसवणूक तुमच्या विनाशाची सर्व दारे उघडते. तुम्ही कितीही महान बुद्धिबळपटू असलात तरी सामान्य माणसाची फसवणूक केल्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील.

श्रीकृष्ण म्हणतात की, या पृथ्वीतलावर कोणीही कर्माच्या तावडीतून वाचले नाही. त्याने केलेल्या कृत्याची किंमत त्याला मोजावी लागेल. आज नाही तर उद्या त्याची कृत्ये नक्कीच उघड होतील.

श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, एखाद्याला कोणाची साथ मिळाली नाही तर कधीही निराश होऊ नये कारण कोणी साथ दिली किंवा नाही दिली तरी प्रत्येक कठीण क्षणात देव आपल्याला नक्कीच साथ देतो.

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की, हसतमुखाने दु:ख सहन केले, तर देव स्वतः त्या दु:ख देणाऱ्या व्यक्तीचा बदला घेतो. म्हणून, कोणत्याही परिस्थितीत हसणे थांबवू नये.

उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।।

मनुष्याने स्वतःचा उद्धार, विकास स्वतःचं करावा, आपणच आपला नाश करू नये, आपणहून अधोगतीला जाऊ नये.

Whats_app_banner