Geeta Updesh: माणसाच्या जीवनात कर्माचे महत्त्व काय? भगवदगीतेतील ‘या’ श्लोकांमधून उलगडतं रहस्य! वाचा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: माणसाच्या जीवनात कर्माचे महत्त्व काय? भगवदगीतेतील ‘या’ श्लोकांमधून उलगडतं रहस्य! वाचा

Geeta Updesh: माणसाच्या जीवनात कर्माचे महत्त्व काय? भगवदगीतेतील ‘या’ श्लोकांमधून उलगडतं रहस्य! वाचा

Jul 20, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi:श्रीमद भागवत गीता हा ज्ञानाचा खजिना मानला जातो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत यशाची अनेक रहस्ये सांगितली आहेत. आज जाणून घेऊया कर्माचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: सनातन धर्मात श्रीमद भागवत गीतेला विशेष महत्त्व आहे. भगवत गीतेची उपासना म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाची पूजाच मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, जो व्यक्ती भगवद्गीतेचा पूर्ण भक्तीभावाने पाठ करतात आणि त्यातील मूल्यांचे पालन करतात, ते आपल्या आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. कारण यश मिळवण्याची अनेक रहस्ये भगवद्गीतेत सांगितली आहेत. श्रीमद भागवत गीता हा ज्ञानाचा खजिना मानला जातो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत यशाची अनेक रहस्ये सांगितली आहेत. आज जाणून घेऊया कर्माचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?

 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

अर्थ: ज्या प्रकारचे काम एक महान व्यक्ती करते किंवा महान व्यक्ती ज्या कामात गुंतलेली असते, त्याचे अनुयायी बनून इतर लोकही त्याचप्रमाणे वागू लागतात. श्रीमद्भागवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील २१व्या श्लोकात महान किंवा प्रसिद्ध व्यक्तीने आपले आचरण शुद्ध ठेवावे, असे सांगितले आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची वागणूक हीन असेल, तर इतर लोकही तीच वागणूक अंगीकारतात. त्यामुळे अशा व्यक्तीने आपले वर्तन नेहमी स्वच्छ ठेवावे.

Vastu Tips : तुमच्याही घरात सतत होतात मतभेद-वादविवाद? वास्तुशास्त्र सांगते याचे कारण आणि उपाय

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्‍क्षति।

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः।।

अर्थ: जो कधीही अतिउत्साह दाखवत नाही, द्वेषात राहत नाही आणि ज्याच्या इच्छा मर्यादित आहेत, जो सर्व शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करतो, असा व्यक्ती मला प्रिय आहे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवद्गीतेच्या १२व्या अध्यायातील १७व्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रिय भक्ताबद्दल सांगितले आहे. ज्या व्यक्तीचे आचरण वरील आचरणांशी जुळते, त्याला श्रीहरीच्या चरणी स्थान मिळते. असा भक्त देवाला प्रिय असतो.

 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भु मा ते संगोSस्त्वकर्मणि।।

अर्थ: एखाद्या व्यक्तीला आपले काम पूर्ण निष्ठेने करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचे परिणाम काय असतील, हे त्याच्या हातात नाही. मनुष्याने आपल्या कृतींच्या परिणामांबद्दल जास्त विचार करू नये किंवा परिणाम न मिळाल्यास कृती न करण्याचा विचारही करू नये. गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या ३७व्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी कर्म हेच आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. यात असंही म्हटलं आहे की, माणसाने कधीही आपले काम करण्यापासून मागे हटू नये.

Whats_app_banner