Geeta Updesh: शरीराने नव्हे तर चांगल्या मनाने बनते व्यक्तीची ओळख! काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? वाचा...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: शरीराने नव्हे तर चांगल्या मनाने बनते व्यक्तीची ओळख! काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? वाचा...

Geeta Updesh: शरीराने नव्हे तर चांगल्या मनाने बनते व्यक्तीची ओळख! काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? वाचा...

Published Jul 12, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीतेतील शिकवण अंगीकारल्याने मनुष्याचे जीवन चांगले बनते. या गोष्टींचे पालन केल्याने माणसाच्या आतून राग आणि मत्सराची भावना नाहीशी होते.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीतेत भगवान श्रीकृष्णाने अतिशय मोलाची शिकवण दिली आहे. श्रीकृष्णाची शिकवण ऐकून अर्जुन आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत असल्याचे सांगितले जाते. गीतेत सांगितलेले श्रीकृष्णाचे शब्द आजही जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

श्रीमद भागवत गीतेतील विचारांचा अवलंब केल्याने जीवन चांगले बनते. या गोष्टींचे पालन केल्याने माणसाच्या आतून राग आणि मत्सराची भावना नाहीशी होते. श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या गोष्टी जाणून घेऊया...

Swapna Shastra : स्वप्नात शारीरिक संबंध होताना पाहताय? वाचा अशा स्वप्नांचा काय आहे अर्थ

काय सांगते श्रीकृष्णाची शिकवण?

> श्रीमद भागवत गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या शरीराने नव्हे, तर त्याच्या मनाने केली पाहिजे. शरीराने आकर्षित होण्याऐवजी माणसाचे अंतरंग समजून घेतले पाहिजे.

> भगवदगीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, प्रत्येक मानवाने हे जन्म आणि मृत्यूचे चक्र समजून घेतले पाहिजे. कारण मानवी जीवनाचे एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू. जो माणूस या जगात जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो.

Durga Ashtami : मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? वाचा तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि संपूर्ण दुर्गा चालीसा

> गीतेमध्ये लिहिले आहे की, कोणतेही काम करताना तुम्हाला भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा की, तुमचे काम खरोखरच शौर्याचे असणार आहे.

> गीतेमध्ये असे लिहिले आहे की, आपले डोळे आपल्याला केवळ दृष्टी देतात. परंतु, आपण काय आणि केव्हा पाहावे, हे सर्व आपल्या भावनांवर अवलंबून असते.

> श्रीकृष्णाच्या मते मनुष्याने भगवंताच्या चरणी लीन झाले पाहिजे. माणसाला देवाशिवाय कुणीही वाली नाही. इतकंच नाही तर, आपणही कुणाचे नाही, या विश्वासाने काम केले पाहिजे.

> गीतेनुसार, भोगातून मिळणारे सुख हे क्षणिक असते. तर, कायमस्वरूपी सुख हे त्यागात असते. श्रीकृष्ण म्हणतात की, भगवंताच्या कृपेने मनुष्याला सत्संग मिळतो, तर मनुष्य त्याच्या कर्मांमुळे वाईट संगतीत पडतो.

Whats_app_banner