Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हा भारतीय महाकाव्य महाभारताचा एक भाग आहे. माणसाने कसे असावे आणि कसे असू नये, हे भगवद्गीतेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. यामध्ये अनेक धडे आणि शिकवणी आहेत, जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लागू केली पाहिजेत. भगवद्गीता ही स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे शिकवले त्याचे सार आहे. त्यातील काही सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली श्लोकांचे अर्थ जाणून घेऊया. यातून माणसाला कसे जगायचे याची शिकवण मिळते…
हा एक असा श्लोक आहे, जो प्रत्येकजण सहजपणे पाठ करू शकतो. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याची कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडली पाहिजेत. त्या कर्तव्याचे फळ काय मिळेल याची अपेक्षा करू नये. हा भगवद्गीतेतील प्रसिद्ध आणि शक्तिशाली श्लोक आहे. हा श्लोक लोकांना एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहित करतो. यात कोणत्याही परिणामाची अपेक्षा न करता कोणतेही काम करण्याचा सल्ला दिला जातो.
हा श्लोक उच्चारायला थोडा कठीण आहे पण त्याचा अर्थ खूप शक्तिशाली आहे. याचा अर्थ असा की जे काही अस्तित्वात आहे ते एक आध्यात्मिक- भौतिक आहे, जे माझ्यापासून उत्पन्न झाले आहे. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की, ते या पृथ्वीवरील सर्व जीवांचे कारण आहेत. याचा अर्थ त्यांच्या दैवी सर्वशक्तिमानतेवर भर देण्यात आला आहे. या श्लोकातून लोकांना आठवण करून देण्यात आली आहे की, विश्वातील प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापासून उद्भवली आहे आणि त्यांच्यासाठी सगळे समान आहेत.
हा श्लोकही अनेकांनी ऐकला आहे. याचा अर्थ असा आहे की, मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, त्यांच्या हृदयात वास करतो आहे. म्हणजेच देव आपल्या हृदयात आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे. तो आत्मा असो, वा भौतिक जीव, तो आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत वास करत आहे.
हा भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा श्लोक माहीत आहे. याचा अर्थ असा आहे की, ‘जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचं महत्त्व कमी होईल, आणि अधर्म वाढेल, तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेऊन आणि अधर्माचा संहार करेन.’ या श्लोकाद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आश्वासन देत आहेत की, जेव्हा नैतिकता आणि धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा, जेव्हा पृथ्वीवर अन्याय होईल, तेव्हा मी परत येईन आणि धर्माची पुनर्स्थापना करेन.
संबंधित बातम्या